Sunday 29 April 2012

वेब डिझाईन


गेल्या दोन दशकात इंटरनेटने अभूतपूर्व प्रगती करून जगातील सार्‍या लोकांना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. केवळ परस्पर संपर्कच नव्हॆ तर धर्म, भाषा, रूढी या कृत्रिम भेदांच्या व स्थान व वेळ या नैसर्गिक बंधनांच्या बेड्या तोडून जगातील ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले केले आहे. साहजिकच यामुळे सर्व क्षेत्रांतील ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असून उद्योग व्यवसायासाठी अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. अर्थात स्पर्धाही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. टेक्नॉलॊजीमध्ये विलक्षण वेगाने बदल होत असून जुन्या पद्धती नामशेष होत आहेत.

इतर क्षेत्राप्रमाणे खुद्द इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्येदेखील फार फेरबदल होत आहेत. कॅमेरा, टीव्ही, मोबाईल, नोटबुक, आयपॅड, लॅपटॉप यासारखी नवी संगणक उपकरणे व त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, माहिती साठविण्याच्या व वितरण करण्याच्या पद्धती यात सतत नूतनीकरण होत असल्याने या क्षेत्राच्या अभ्यासक्रमात व पुस्तकांत असलेले ज्ञान प्रत्यही कालबाह्य होत आहे. त्यामुळे इंटरनेट हेच ज्ञानप्राप्तीचे एकमेव माध्यम बनले आहे. संपर्कासाठी इमेल व संवादसुविधा पुरेशी ठरली तरी माहितीसाठी वेबसाईट हेच इंटरनेटचे महत्वाचे साधन आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीपने आपली पहिली वेबसाईट तयार केली. त्यावेळी ती तयार करण्यासाठी, सर्व्हरवर ठेवण्यासाठी व नंतर ती इतरांना (त्यावेळी फारच थोड्या लोकांकडे कॉम्प्युटर होते) त्यांच्या संगणकावर दाखविण्यासाठी किती प्रयास पडले याचा मोठा इतिहास आहे. साधे एचटीएमएल टॅग व रंगीबेरंगी जावा अप्लेटची तयार बटने वापरून केलेल्या त्या वेबसाईटचे लोकांना त्यावेळी किती अप्रूप वाटले होते. व्हीएसएनएलच्या नेटवर्कमधील रूटरची कॅशे मेमरी फ्लश करण्यात विलंब लागत असल्याने वेबसाईटवरील बदलही सर्व ठिकाणी दिसण्यास वेळ लागत असे. सर्व जगभर ही वेबसाईट पाहता येते यावर लोकांचा विश्वास बसत नसे. आता ज्ञानदीपची सध्याची वेबसाईट खूपच वेगळी व आधुनिक आहे.

रोज नवनवे प्रयोग करून वेबसाईट अधिक चांगली व कार्यक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. त्या काळात शाळा कॉलेजच्या केलेल्या आमच्या सार्‍या वेबसाईट स्टॅटिक होत्या. फ्लॅश तंत्रज्ञानाचा वापर करून वालचंद कॉलेजच्या नकाशाचे मोड्यूल बनविले व कॉलेजच्या लायब्ररीतील सर्व पुस्तकांची यादी वालचंदसांगली (walchandsangli.org) या वेबसाईटवर पाहण्याची सोय अक्सेस डाटाबेसचा वापर करून केली. परंतु केवळ चमत्कृती व कुतुहल या भावनेतून त्याकडे पाहिले गेल्याने त्याचे महत्व लोकांना उमगले नाही. श्री लिपी डायनॅमिक फॉंट व डाटाबेसव एक़एमल यांचा वापर करून मराठी माध्यमातील संस्कृतदीपिका (sanskritdeepika.org) ही वेबसाईट बनविली तेव्हा तीही पुढे कालबाह्य ठरेल याची आम्हाला कल्पना आली नव्हती.

वेबसाईटच्या डिझाईन पद्धतीमध्ये नवनव्या सुधारणा होत होत्या. स्टाईल शीटचा वापर, व्हीबी स्क्रीप्ट वापरून (asp code) वेबसाईटचे सुटे भाग एकत्र जोडणे, अभिप्राय, इमेल व गेस्टबुकची सोय, फ्लॅश फोटोगॅलरी यामुळे ज्ञानदीपच्या वेबडिझाईन दर्जात बरीच सुधारणा झाली होती. तरीदेखील लोकांना या प्रभावी प्रसार व संपर्क माध्यमाची माहिती नसल्याने वेबसाईटकडे केवळ एखाद्या छापील जाहिरातीच्या दृष्टीने पाहिले गेल्याने कमी खर्चात कामचलावू वेबसाईट करण्याकडे लोकांचा ओढा होता. आजही ज्ञानदीपच्या अनेक जुन्या वेबसाईट त्याच जुन्या कालबाह्य स्वरुपात चालू आहेत. त्यांचे त्वरित आधुनिकीकरण करण्याची गरज ग्राहकांना पटवून देण्याचे अवघड काम ज्ञानदीपला आता करावे लागत आहे.

सुदैवाने नवनव्या आकर्षक डायनॅमिक वेबसाईट लोकांच्या पाहण्यात आल्याने, व्यावसायिक स्पर्धा वाढल्याने, शासकीय स्तरावर इ गव्हर्नन्सचा वापर वाढल्याने व इंटरनेटचा स्पीड वाढल्याने परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मात्र वेबसाईट डिझाईन करणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाल्याने येथेही तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार याची ज्ञानदीपला कल्पना आहे. अनेक वर्षांचा अनुभव ही शिदोरी वेबडिझाईन क्षेत्रात पुरेशी नाही याची ज्ञानदीपला पुरेपूर जाणीव आहे. याच दृष्टीकोनातून नवे तंत्रज्ञान शिकून वेबडिझाईनमध्ये कालानुरूप सतत बदल करण्याचे धोरण आम्ही अंमलात आणले आहे.अर्थात शिकलेले वेबडिझायनर नोकरी सोडून पुण्या-मुंबईकडे गेले की पुन्हा नव्या उमेदवारांच्या शिक्षण व संशोधनासाठी वेळ खर्च करणे क्रमप्राप्त ठरते. आतापर्यंत असे १५ अनुभवी वेबडिझायनर ज्ञानदीपने इतर संस्थांना मिळवून दिले आहेत.

विषयाला अनुरूप आकर्षक रंगसंगती व मजकुराची मांडणी यावर वेबसाईटचे यश अवलंबून असते. त्यामुळे ग्राफिक डिझाईनला फार महत्व आहे.वेबसाईट सर्व ब्राऊजरमध्ये व्यवस्थित एकसारखी दिसावी यासाठी विषेश प्रयत्न करावे लागतात. w3c या संस्थेकडून वेबसाईटचे परिक्षण करून तिचे प्रमाणपत्र घेता येते.

डायनॅमिक मेनू, सरकत्या चित्रपट्ट्या, आकर्षक फोटो व व्हिडिओगॅलरी, साईटमॅप, टॅग क्लाऊड, विजेट, ट्विटर, फेसबुक, पिकासा इत्यादी (web 2.0) समूह संपर्क साधनांचा, गुगल मॅप, गुगल ऍड, मतपेटी, शॉपिंग कार्ट यासारख्या मोड्यूल्सचा समावेश अशा अनेक अपेक्षा आधुनिक वेबडिझाईनमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी वेब डिझाईनवर असते.सर्च इंजिन हे इंटरनेटवर माहिती शोधण्याचे मुख्य साधन आहे. त्याच्या शोधयादीत वेबसाईटचे स्थान वर येण्यासाठी सर्च इंजिन ऑफ्टिमायझेशन ही काळाची गरज बनली आहे.

याशिवाय वेबसाईटवर माहिती, चित्रे वा व्हिडिओ टाकण्याचे व रंगसंगती व मांडणी बदलण्याचे काम कोणतीही टेक्निकल माहिती नसणार्‍या वेबसाईट मालकाला करता यावी यासाठी ब्लॉग, वर्डप्रेस, जुमला, द्रुपल यासारख्या विविध वेबसाईट व्यवस्थापन प्रणाली विकसित झाल्या आहेत. डॉट नेट, कोड इग्नायटर, कोहाना, सिंफनी, पायरोसीएमएस यासारखे आकृतीबंधही (frameworks) अधिकाधिक वापरात येत आहेत. त्यातील योग्य पर्यायाची निवड करणेही आवश्यक असते. वेबसाईटवरील माहितीत उपर्‍या व्यक्तीने फेरफार करू नयेत यासाठी वेबसाईटला योग्य ती सुरक्षायंत्रणाही बसवावी लागते.

गेल्या काही वर्षांत ज्ञानदीपने पीएचपी, अजॅक्सचा वापर करून टेबललेस डिआयव्ही बेस्ड वेबसाईट तयार केल्या आहेत. जुमला, वर्डप्रेस व कोहाना मध्ये वेबसाईट तयार करून त्याचे व्यवस्थापन वेबसाईट मालकांकडे सुपूर्त केले आहे.बंगलोर महाराष्ट्र मंडळ, बंगलोर (mmbangalore.org.in) व लायन्स नॅब, मिरज(lneh.org) या संस्थांनी आपल्या बेबसाईट ज्ञानदीपकडून आधुनिक करून घेतल्या आहेत. उगारशुगर वर्क्सच्या वेबसाईटचे नूतनीकरण चालू आहे. इतरांनीही सध्याच्या काळातील वेबसाईटचे महत्व जाणून आपल्या आवश्यकतेनुसार वेबसाईटचे नूतनीकरण करून घ्यावे व आपल्या व्यवसाय वा उद्योगास आधुनिकतेची जोड द्यावयास हवी.

आता द्विमिती तंत्रज्ञानातून त्रिमिती तंत्रज्ञानाकडे व कॉम्प्यूटरकडून मोबाईलकडे वेबसाईटची वाटचाल चालू आहे. फ्लॅश/फ्लेक्स/ एक्शन्स्क्रीप्ट ३.० याचा वापर वाढला आहे. ज्ञानदीप या क्षेत्रातही आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या चालू असलेला परदेशातील बांधकाम क्षेत्रातील एक त्रिमिती प्रकल्प त्यादृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
 
गेल्या दोन दशकात इंटरनेटने अभूतपूर्व प्रगती करून जगातील सार्‍या लोकांना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. केवळ परस्पर संपर्कच नव्हॆ तर धर्म, भाषा, रूढी या कृत्रिम भेदांच्या व स्थान व वेळ या नैसर्गिक बंधनांच्या बेड्या तोडून जगातील ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले केले आहे. साहजिकच यामुळे सर्व क्षेत्रांतील ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असून उद्योग व्यवसायासाठी अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. अर्थात स्पर्धाही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. टेक्नॉलॊजीमध्ये विलक्षण वेगाने बदल होत असून जुन्या पद्धती नामशेष होत आहेत.

इतर क्षेत्राप्रमाणे खुद्द इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्येदेखील फार फेरबदल होत आहेत. कॅमेरा, टीव्ही, मोबाईल, नोटबुक, आयपॅड, लॅपटॉप यासारखी नवी संगणक उपकरणे व त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, माहिती साठविण्याच्या व वितरण करण्याच्या पद्धती यात सतत नूतनीकरण होत असल्याने या क्षेत्राच्या अभ्यासक्रमात व पुस्तकांत असलेले ज्ञान प्रत्यही कालबाह्य होत आहे. त्यामुळे इंटरनेट हेच ज्ञानप्राप्तीचे एकमेव माध्यम बनले आहे. संपर्कासाठी इमेल व संवादसुविधा पुरेशी ठरली तरी माहितीसाठी वेबसाईट हेच इंटरनेटचे महत्वाचे साधन आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीपने आपली पहिली वेबसाईट तयार केली. त्यावेळी ती तयार करण्यासाठी, सर्व्हरवर ठेवण्यासाठी व नंतर ती इतरांना (त्यावेळी फारच थोड्या लोकांकडे कॉम्प्युटर होते) त्यांच्या संगणकावर दाखविण्यासाठी किती प्रयास पडले याचा मोठा इतिहास आहे. साधे एचटीएमएल टॅग व रंगीबेरंगी जावा अप्लेटची तयार बटने वापरून केलेल्या त्या वेबसाईटचे लोकांना त्यावेळी किती अप्रूप वाटले होते. व्हीएसएनएलच्या नेटवर्कमधील रूटरची कॅशे मेमरी फ्लश करण्यात विलंब लागत असल्याने वेबसाईटवरील बदलही सर्व ठिकाणी दिसण्यास वेळ लागत असे. सर्व जगभर ही वेबसाईट पाहता येते यावर लोकांचा विश्वास बसत नसे. आता ज्ञानदीपची सध्याची वेबसाईट खूपच वेगळी व आधुनिक आहे.

रोज नवनवे प्रयोग करून वेबसाईट अधिक चांगली व कार्यक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. त्या काळात शाळा कॉलेजच्या केलेल्या आमच्या सार्‍या वेबसाईट स्टॅटिक होत्या. फ्लॅश तंत्रज्ञानाचा वापर करून वालचंद कॉलेजच्या नकाशाचे मोड्यूल बनविले व कॉलेजच्या लायब्ररीतील सर्व पुस्तकांची यादी वालचंदसांगली (walchandsangli.org) या वेबसाईटवर पाहण्याची सोय अक्सेस डाटाबेसचा वापर करून केली. परंतु केवळ चमत्कृती व कुतुहल या भावनेतून त्याकडे पाहिले गेल्याने त्याचे महत्व लोकांना उमगले नाही. श्री लिपी डायनॅमिक फॉंट व डाटाबेसव एक़एमल यांचा वापर करून मराठी माध्यमातील संस्कृतदीपिका (sanskritdeepika.org) ही वेबसाईट बनविली तेव्हा तीही पुढे कालबाह्य ठरेल याची आम्हाला कल्पना आली नव्हती.

वेबसाईटच्या डिझाईन पद्धतीमध्ये नवनव्या सुधारणा होत होत्या. स्टाईल शीटचा वापर, व्हीबी स्क्रीप्ट वापरून (asp code) वेबसाईटचे सुटे भाग एकत्र जोडणे, अभिप्राय, इमेल व गेस्टबुकची सोय, फ्लॅश फोटोगॅलरी यामुळे ज्ञानदीपच्या वेबडिझाईन दर्जात बरीच सुधारणा झाली होती. तरीदेखील लोकांना या प्रभावी प्रसार व संपर्क माध्यमाची माहिती नसल्याने वेबसाईटकडे केवळ एखाद्या छापील जाहिरातीच्या दृष्टीने पाहिले गेल्याने कमी खर्चात कामचलावू वेबसाईट करण्याकडे लोकांचा ओढा होता. आजही ज्ञानदीपच्या अनेक जुन्या वेबसाईट त्याच जुन्या कालबाह्य स्वरुपात चालू आहेत. त्यांचे त्वरित आधुनिकीकरण करण्याची गरज ग्राहकांना पटवून देण्याचे अवघड काम ज्ञानदीपला आता करावे लागत आहे.

सुदैवाने नवनव्या आकर्षक डायनॅमिक वेबसाईट लोकांच्या पाहण्यात आल्याने, व्यावसायिक स्पर्धा वाढल्याने, शासकीय स्तरावर इ गव्हर्नन्सचा वापर वाढल्याने व इंटरनेटचा स्पीड वाढल्याने परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मात्र वेबसाईट डिझाईन करणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाल्याने येथेही तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार याची ज्ञानदीपला कल्पना आहे. अनेक वर्षांचा अनुभव ही शिदोरी वेबडिझाईन क्षेत्रात पुरेशी नाही याची ज्ञानदीपला पुरेपूर जाणीव आहे. याच दृष्टीकोनातून नवे तंत्रज्ञान शिकून वेबडिझाईनमध्ये कालानुरूप सतत बदल करण्याचे धोरण आम्ही अंमलात आणले आहे.अर्थात शिकलेले वेबडिझायनर नोकरी सोडून पुण्या-मुंबईकडे गेले की पुन्हा नव्या उमेदवारांच्या शिक्षण व संशोधनासाठी वेळ खर्च करणे क्रमप्राप्त ठरते. आतापर्यंत असे १५ अनुभवी वेबडिझायनर ज्ञानदीपने इतर संस्थांना मिळवून दिले आहेत.

विषयाला अनुरूप आकर्षक रंगसंगती व मजकुराची मांडणी यावर वेबसाईटचे यश अवलंबून असते. त्यामुळे ग्राफिक डिझाईनला फार महत्व आहे.वेबसाईट सर्व ब्राऊजरमध्ये व्यवस्थित एकसारखी दिसावी यासाठी विषेश प्रयत्न करावे लागतात. w3c या संस्थेकडून वेबसाईटचे परिक्षण करून तिचे प्रमाणपत्र घेता येते.

डायनॅमिक मेनू, सरकत्या चित्रपट्ट्या, आकर्षक फोटो व व्हिडिओगॅलरी, साईटमॅप, टॅग क्लाऊड, विजेट, ट्विटर, फेसबुक, पिकासा इत्यादी (web 2.0) समूह संपर्क साधनांचा, गुगल मॅप, गुगल ऍड, मतपेटी, शॉपिंग कार्ट यासारख्या मोड्यूल्सचा समावेश अशा अनेक अपेक्षा आधुनिक वेबडिझाईनमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी वेब डिझाईनवर असते.सर्च इंजिन हे इंटरनेटवर माहिती शोधण्याचे मुख्य साधन आहे. त्याच्या शोधयादीत वेबसाईटचे स्थान वर येण्यासाठी सर्च इंजिन ऑफ्टिमायझेशन ही काळाची गरज बनली आहे.

याशिवाय वेबसाईटवर माहिती, चित्रे वा व्हिडिओ टाकण्याचे व रंगसंगती व मांडणी बदलण्याचे काम कोणतीही टेक्निकल माहिती नसणार्‍या वेबसाईट मालकाला करता यावी यासाठी ब्लॉग, वर्डप्रेस, जुमला, द्रुपल यासारख्या विविध वेबसाईट व्यवस्थापन प्रणाली विकसित झाल्या आहेत. डॉट नेट, कोड इग्नायटर, कोहाना, सिंफनी, पायरोसीएमएस यासारखे आकृतीबंधही (frameworks) अधिकाधिक वापरात येत आहेत. त्यातील योग्य पर्यायाची निवड करणेही आवश्यक असते. वेबसाईटवरील माहितीत उपर्‍या व्यक्तीने फेरफार करू नयेत यासाठी वेबसाईटला योग्य ती सुरक्षायंत्रणाही बसवावी लागते.

गेल्या काही वर्षांत ज्ञानदीपने पीएचपी, अजॅक्सचा वापर करून टेबललेस डिआयव्ही बेस्ड वेबसाईट तयार केल्या आहेत. जुमला, वर्डप्रेस व कोहाना मध्ये वेबसाईट तयार करून त्याचे व्यवस्थापन वेबसाईट मालकांकडे सुपूर्त केले आहे.बंगलोर महाराष्ट्र मंडळ, बंगलोर (mmbangalore.org.in) व लायन्स नॅब, मिरज(lneh.org) या संस्थांनी आपल्या बेबसाईट ज्ञानदीपकडून आधुनिक करून घेतल्या आहेत. उगारशुगर वर्क्सच्या वेबसाईटचे नूतनीकरण चालू आहे. इतरांनीही सध्याच्या काळातील वेबसाईटचे महत्व जाणून आपल्या आवश्यकतेनुसार वेबसाईटचे नूतनीकरण करून घ्यावे व आपल्या व्यवसाय वा उद्योगास आधुनिकतेची जोड द्यावयास हवी.

आता द्विमिती तंत्रज्ञानातून त्रिमिती तंत्रज्ञानाकडे व कॉम्प्यूटरकडून मोबाईलकडे वेबसाईटची वाटचाल चालू आहे. फ्लॅश/फ्लेक्स/ एक्शन्स्क्रीप्ट ३.० याचा वापर वाढला आहे. ज्ञानदीप या क्षेत्रातही आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या चालू असलेला परदेशातील बांधकाम क्षेत्रातील एक त्रिमिती प्रकल्प त्यादृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
 

Saturday 28 April 2012

इंटरव्ह्यू देताना (भाग - 2

कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ?

सोनाली मांजरेकर :
तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं,कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ?

सोनाली मांजरेकर :
तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं, आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नासते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ?

सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो.

डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत.

शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ?

डॉमनिक कोस्टाबिर :
असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं.

नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ?

डॉमनिक कोस्टाबिर :
हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो.

सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल.

आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही.

सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं.

अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, अशावेळी काय उत्तर द्यावं ?


सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते.
आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नासते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ?

सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो.

डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत.

शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ?

डॉमनिक कोस्टाबिर :
असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं.

नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ?

डॉमनिक कोस्टाबिर :
हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो.

सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल.

आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही.

सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं.

अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, अशावेळी काय उत्तर द्यावं ?


सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते.

हडबडू गडबडू नका, धीर धरा (सुखी व्हा हसत-खेळत)

एखाद्या कामात अपयश आल्यास भीती वाटते व ताण निर्माण होतो. घाबरलेला माणूस ते कामच सोडून देतो. भीतीमुळे कार्य सोडणे चूक आहे. प्रबळ इच्छाशक्ती बाळगा आणि तेच काम पूर्ण करून टाका. यश नक्की मिळेल आणि पुढच्या वेळेला तुम्ही घाबरणार नाही.

जर तुमच्या मनावर ताण आला, तर मन शांत करून विश्रांती घ्या, आडवे व्हा आणि दीर्घ श्‍वास घेऊन विचार करा की, भीतीची किंवा रागावण्याची जरूर आहे काय? मन प्रसन्न ठेवल्यास सर्व प्रश्‍न सुलभपणे सुटतात. मनात खळबळ माजली असेल, तर शरीर सैल करून आडवे व्हा किंवा बसा. हे तंत्र वापरून तर पाहा. ज्यामुळे मनावर ताण येतो, त्याच्या विरुद्ध भावना मनात निर्माण करा.

समजा तुम्हाला इंजेक्‍शनची भीती वाटते. त्यामुळे तुमच्या मनावर ताण येतो. त्यावेळी विचार करा की, इंजेक्‍शन अगदी लहान बालकांनाही टोचतात. त्या बालकाला जर नंतर त्रास होत नाही, तर तुम्हालाही नंतर त्रास होणार नाही. न्यायालयात साक्ष देताना साक्षीदार घाबरतात. त्याच्या मनावर ताण असतो. त्यावेळी असा विचार करा की, येथे न्यायाधीश, वकील, पक्षकार इतकेच तर लोक आहेत. ही काही कोणी राक्षस नाहीत. आपल्यासारखीच माणसे आहेत. हे सर्व जण शिस्तीत वागणारे आहेत. मग तुम्ही साक्ष द्यायला घाबरायचं कशाला? अनेक उमेदवार मुलाखत देताना घाबरतात. त्यावेळी तुम्ही मनात आणा की, मुलाखत घेणारे आपल्यासारखे तर आहेत.

त्यांना शिंगंबिंगं नाहीत. ती आपल्यासारखीच माणसे आहेत. ज्यांना तुम्ही भयंकर व भीतिदायक खुनी समजता, तेसुद्धा खरोखर तुम्ही समजताइतके वाईट नसतात. तुमच्या मनातील कल्पनेमुळे तुम्ही त्यांना घाबरत असता.

काही कामे करावी तर लागतातच; पण त्या कामात अपघाताची व अनिष्ट होण्याची भीती असते किंवा अपयशाची भीती वाटते. त्यावेळी तुम्ही असा विचार करा की, अजून तर अपघात किंवा संकट आलेले नाही ना? येईल तेव्हा त्याचा सामना कसा करायचा, याचा विचार करू. पुलापाशी पोहोचल्यानंतर

लोन घ्या आणि आयुष्यभर फेडा

परवा ‘ती’ च्या आई सोबत गप्पा मारत असताना सहजच माझ्या घरासाठी काढलेल्या लोन विषयी चर्चा सुरु झाली. आता माझ लोन फार नाही. त्यामुळे लोन फेडण्याचा कालावधी देखील कमी आहे. काकू म्हणाल्या ‘तुझ बर आहे, चार वर्षात तू लोन मधून मोकळा होशील.’ काकूंचा मुलगा म्हणजे ‘ती’ चा मोठा भाऊ. त्याने मागील महिन्यात डांगे चौकात टू बीएचके घेतला आहे. काकू सांगत होत्या त्याला वीस वर्षे आता कर्ज फेडावे लागणार. आमच्या कंपनीतील बहुतेक सर्वांनीच घरासाठी विविध बँकामधून कर्जे काढली आहेत. बर कर्जे पण अशी न की, वीस – तीस लाखांच्या घरात. आता सगळेच महिन्याच्या महिन्याला पगारातील एक मोठा हिस्सा बँकेला देत असतात. म्हणजे मी पण तसा देतो.
काकूंना म्हणालो की ‘मी आधी घराच्या कर्जासाठी एचडीएफसी बँकेत चौकशी केली होती. आणि त्यांनी मला सहा लाखच कर्ज देखील मंजूर केल होत. त्यांनी सगळा हिशेब करून मला वीस वर्षांसाठी ६३०० रुपयांचा हप्त्याने फेडण्याचे सांगितले होते. मलाही खूप आनंद झाला होता. पण घरी येऊन मी जेव्हा हप्ता आणि महिने याचं गणित केल त्यावेळी लक्षात आल की बँक मला सहा लाखच कर्ज देणार आणि माझ्याकडून हप्त्याने पंधरा लाख बारा हजार रुपये घेणार. एकूणच व्यवहार तोट्यात असल्याने मी कर्ज घेण्याचा निर्णय स्थगित केला.’ त्या म्हणाल्या ‘बरोबर आहे. म्हणजे ती च्या भावाकडून देखील दुप्पटीपेक्षा अधिक घेणार.’ काकुनी मला विचारलं ‘मग तू घरासाठी पैसे कसे जमा केले?’
मी त्यांना सांगितले की आई – वडिलांनी मदत केली. आणि बाकी उरलेल्या रकमेसाठी मी कर्ज घेतलं. खर सांगायचं झाल तर कर्ज घेण टाळावं. म्हणजे मी तरी टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा संगणक घेताना आणि माझा मोबाईल घेण्यासाठी मी प्रथम पैसे जमा केले होते. आणि नंतर वस्तू घेतली. कारण एकदा का कर्ज घेतलं की आपण बंधनात अडकून पडतो. एक तर रुपयाची वस्तू अडीच रुपयाला विकत घेतो. आणि हप्त्याच्या चिंतेपायी नवीन काही खरेदी करण्याचे टाळतो. म्हणजे सद्याला माझ अस झाल आहे की मोठी काही खरेदी म्हटलं की माझ्या डोकेदुखीचा विषय बनून जातो. त्यात माझ्या घराचे माझ्या लग्नाचा घाट घालून बसले आहेत. बहुतेक पुढच्या वर्षीच्या मे महिन्यानंतर मला एखादी मुलगी पसंत करावीच लागेल. माझी सद्याची मिळकत बघता, दोघांचा खर्च आणि कर्जाचा हप्ता सहजपणे निघेल. पण बचत नावाचा काही प्रकार घडण्याची शक्यता फारच कमी वाटते. कारण मी ‘ती’च्या बहिणीला सोडून इतर जेवढ्या मुली बघितल्या आहेत त्यांच्या बद्दल एकाच शब्द वापरावा वाटतो ‘उधळ्या’. आता मला एखादी अशी भेटली की माझ सगळ दिवाळ निघायला फार काही वेळ लागणार नाही. काकू म्हणाल्या ‘आता घर खर्च कसा भागवतो?’ काकूंना सांगितलं ‘आई आहे. पण ती खर्च फ़क़्त खाण्या पिण्यावर करते. बाकी फालतू खर्च नाहीत. उलट ती असल्याने माझा बाहेरचा जेवणाचा खर्च वाचतो.’ एकूण काय काकूंना एवढ तर कळलं की माझ सध्याला सोसो चालू आहे. माझ्या मित्राने मध्यंतरी सांगितलेला किस्सा. त्याच्या एका मित्राने दोन वर्षात पन्नास एक हजारांचा बँक ब्यालंस करून ठेवला होता. पण लग्नानंतर एका वर्षातच तो संपला. जाऊ द्या, नाही तरी खर्च कोणत्या न कोणत्या मार्गाने जाताच असतो. मध्यंतरी मी दोन बुटाचे जोड घेतले. तीन चार महिन्यांपूर्वी नवीन गैस कनेक्शन घेतले. नाही म्हणता म्हणता महिन्यात किमान पाच एक हजार रुपयांचा असा खर्च होतोच.
आता उद्या कर्जाचा हप्ता भरावा लागेल. ह्या बँक पण न काहीना काही निमित्त काढून सुट्ट्या घेतात. आणि इथ माझी गोची होऊन बसते. आता ह्यांच्या सुट्ट्या आणि माझ पेमेंट एकाच वेळेस का होत हेच कळत नाही. मागील महिन्यात सुट्ट्या नव्हत्या पण काहीतरी बँकने घोळ घातला मग पेमेंट जमा व्हायला उशीर झाला. मग काय माझ्या लहान भावाकडून उसने पैसे घ्यावे लागले. आता ताबडतोप दोन दिवसात परत केले ती वेगळी गोष्ट पण अशी वेळ नेहमी येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतो. पण काही खर्चाच गणित काही बसत नाही. यावेळी सुट्ट्यांचे नवे नाटक. कर्ज काढल्यापासून हे दर महिन्याच्या सुरवातीला चिंता सुरु आहे.

कत्तलीची रात्र

कदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांना एका मतासाठी पन्नास रुपये दिले जायचे. आता हा आकडा निवडणूक आणि तो उमेदवार यावरून कमी जास्त व्हायचा. आता १९९५ साली पन्नास रुपये आकडा खूप मोठा होता. काही पक्षाचे लोक दारू, कोणाला घरासाठी पैसा, जमीन, काहीना कपडे तर काहींना घरांसाठी सिमेंट आणि काहीना रेशनकार्ड अस बरंच काही द्यायचे. आता मत मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला झोपडपट्टीत हे वाटावेच लागतात. हे मी माझ्या मनाच किंवा कुठल्या वर्तमानपत्रात वाचून सांगत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोष्टी घडतात.
आपण जे आघाड्या किंवा युत्या म्हणतो या सगळ्याच पक्षांना अस करावच लागत. मागील विधानसभेच्या वेळी आमच्या गल्लीत देखील हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. आणि हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पहिले आहे. आमच्या गल्लीत प्रत्येक व्यक्ती किमान बारावी पास आहेत. आमची गल्ली सुशिक्षित समजली जाते. पण तिथेही हा प्रकार सुरु झाला आहे. आता उद्या जेव्हा मी मतदानाला जाईल त्यावेळी कळेलच कोणी कोणी पैसे घेतले आहेत. मागील विधानसभेच्या वेळी आमच्या गल्लीतील काही जेष्ठ आणि वयाने मोठ्या असणाऱ्या आजोबा लोकांनी गल्लीतील मंदिरासाठी निधी घेऊन त्याच्या बदल्यात गल्लीतील सगळ्या नागरिकांनी निधी देणाऱ्या उमेदवाराला मत द्यावे असा प्रस्ताव मांडला होता. आता त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना झापल्यावर पुढे तो प्रस्ताव बारगळला. पण असं आमच्या गल्लीत झालं होत. बर कोणीही त्यातील गरीब किंवा फार गरजू अस नाही. किंवा कोणी अशिक्षित नाहीत. यातील बरेच शाळेत किंवा सरकारी खात्यात खूप मोठ्या हुद्द्यावर होते आणि काही आहेत. आमच्या गल्लीत फार काही जास्त नाही पण पन्नास जणांना मतदानाचा अधिकार आहे.
आता आपण स्पष्टच बोलूयात. मागील लोकसभेच्या वेळी निवडणुकीत पन्नासपैकी पाच जणांनी मतदानच केल नाही. उरलेल्यापैकी चौदा जणांनी पैसे घेवून मतदान केले. आणि बाकीच्यांचे आपले खरे मतदान. शेजारची संपूर्ण गल्ली पैसे घेऊन मतदान करते. त्या गल्लीत किमान तीनशे मतदार आहेत. आता नुसता दोन गल्लीचा हिशेब लावला तर त्यातील ३१ जणांनी केलेले खरे मतदान. आता शहरी भागात जरी दिसत नसले तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात होते. आता घरी येताना आमच्या येथील गणेश मंदिरात काही मुले निवडणूक केंद्र आणि वेळेची पत्रके घेऊन हिशेब लावीत होती. त्यांच्याकडे दहा बारा मोठ्या पिशव्या होत्या. ते बघूनच मी इथेही कत्तलीची रात्र होणार हे मी समजून गेलो होतो. आमच्या भागात रेल्वे स्टेशनपासून ते आमच्या बिजलीनगरपर्यंत खूप मोठी झोपडपट्टी आहे. किमान पाच एक हजार सहज मतदार असतील. अजून चिंचवड गावातील चाफेकर चौकात असलेली झोपडपट्टी वेगळीच आहे. पुण्यात तर काही विचारूच नका, निम्मे मतदार झोपडपट्टीतले. ह्या कत्तलीच्या रात्री काही दारू पितात, तर काही आपआपल्या सोसायट्यांना उमेदवारांकडून रंगरंगोटीची कामे करून घेतात. तर काही आपली अनधिकृत बांधकामाला अधिकृत करून घेतात. आता हे मी बघितलंय म्हणून बोलत आहे.
बंर अस करून देखील कोणताही फालतू उमेदवार कसा काय निवडून येतो म्हटलं तर त्याला आपणच जबाबदार आहोत. आमच्या कंपनीत मी, माझा एक मित्र आणि कदाचित माझा बॉस सोडून कोणीही मतदानाला जात नाहीत. त्यांचे कधी पेमेंट स्लीप बघा. आता माझा मित्र बोपोडीत राहतो. त्यांच्या अख्ख्या मतदार संघात हेच चालत. यावेळी बहुतेक त्यांच्याकडे हजार रुपये मत अशी कत्तल चालू आहे. आता ह्या विषयावर कंपनीत बोलल्यावर जे कधीच मतदान करत नाहीत. त्यांना पैसे घेऊन मतदान करण चुकीच वाटल. पण त्याचा काय उपयोग. ते म्हणतात न ‘दुसऱ्याला सांगे ब्रम्हज्ञान स्वत कोरडे पाषाण’ तशातली ही गत आहे. माझ्या चार मित्र आणि त्यांचे घरचे मिळून जवळपास अठरा मतदार आहेत. त्यातले दहा मतदार यावेळी मतदान करतील. ह्याच्यात मी कंपनीतील कोणातच आकडा टाकलेला नाही. साधं सोप गणित आहे. एकूण मतदारातील पन्नास टक्के मतदानच करत नाही. उरलेल्या मतदारांपैकी निम्मे पैसे घेऊन मतदान करतात. आणि उरलेले तुमच्या माझ्यासारखे मग का नाही फालतू उमेदवार निवडून येणार. आणि आपण दिलेली घरपट्टी, पाणीपट्टी, प्रोफेशनल ट्याक्स, इन्कम ट्याक्स अजून काही असतील ते ट्याक्स खाणार. आणि चांगले पक्ष आणि उमेदवार पडणार. हीच कत्तलीची रात्र अनेक उमेदवारांचे भाग्य ठरवते. मतदान हे फ़क़्त नाटक बनून राहते. म्हणजे मी तरी नेहमी मतदान करतोच. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी मुंबईहून आणि या लोकसभेला पुण्याहून पैसे खर्च करून मतदानाला नगरला गेलो होतो. आणि याही वेळी जाणार आहे.

हिंदू अतिरेकी

आज रात्री गच्चीतून फटाके बघताना खूप मजा वाटत होती. काकाच्या मोबाईलचा रिचार्ज आणायाला जाताना काही विचारायलाच नको, कुठे कधी फटका फुटेल काही सांगता येत नव्हते. दोन मिनिटांच्या रस्त्याला दहा मिनिटे लागली. अस वाटत होत की कुठे तरी युद्ध भूमीवरून जातो आहे की काय. चिल्लर पार्टी फारच जोरात होती. परत घरी आल्यावर टीव्हीवर गोवा बॉम्बस्फोटाची बातमी बघितली. ऐन दिवाळीच्या सुरवातीला झालेला बॉम्बस्फोट. आज काही जणांना पकडलं आहे. ते सनातन संस्थेशी सहभाग आहे अस म्हटलं आहे. बघून खरचं खूप छान वाटल. नरक चतुर्दशीचा मुहूर्त फार छान निवडला. निदान आपल्या देशात, आता तो आपला कशावरून हा देखील एक प्रश्नच आहे. नाही मी राजकारणाचा विषय काढत नाही आहे. पण मला तुम्ही सांगा आपला देश सर्वधर्म समभाव बाळगणारा आहे ना. जर हज यात्रेला जाणार्याचा खर्च आपला देश उचलतो. मग अमरनाथला जाताना स्टैंप पेपरवर अस का लिहून द्याव लागत की ‘तिथे जाताना होणाऱ्या अपघात, मृत्यूला फ़क़्त मीच(यात्रेकरू) जबाबदार आहे’.
बघा साध आणि सोप गणित आहे. तराजू स्थिर तेव्हा राहतो ज्यावेळी दोन्ही बाजूला सारख माप असत. जर तुम्ही मशिदीच्या स्पीकरचा खर्च देशात जमा झालेल्या करामधून देणार असेल तर मंदिरावर देखील स्पीकर तुम्ही बसून द्यायला हवा. आमच्या घरात मी आणि माझा लहान भाऊ. वडील कोणतीही गोष्ट आणताना सम समान आणायचे. त्यामुळे माझा आणि त्याच कधी याविषयावरून भांडण होत नसायचं. का होईल? आता दोघांनाही सारख भेटल्यावर कशाला उगाचच मी किंवा तो वाद घालेल. गोधरामध्ये अख्खा रेल्वे डबा जाळून टाकला. त्यातल्या लहान बाळाचं एक फोटो बघून माझ्याही डोळ्यात पाणी आल होत. आता त्यालाते सगळ्यांचेच कोळसे झाले होते. मग मीच काय कोणीही ते बघून त्याच रक्त खवळेल. बर त्यावेळी देशाची मान खाली गेली होती ना जगासमोर? त्यापुढे दंगल झाली. त्यात मुस्लिमांना मार खावा लागला. अनेकांना जाळून मारलं. मग काय चुकीच केल? तुम्ही आमच्या पोर बाळांचा कोळसा करणार आणि आम्ही संयम पाळायचा? तुमचे लोक मुला बाळांना जाळून मुंबईची भेलपुरी खाणार आणि आम्ही फ़क़्त रडायचं.
आता आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला रडायचं शिकवलं नाही. ते स्वत कधीही शत्रू समोर टीप गाळात बसले नाहीत. अफझल खान असो की शाहीस्त्य खान. कोणी नाही सोडला महाराजांनी. अफझल खानच्या वेळी महाराजांनी जर त्यावेळी आयोग नेमून शिफारसी केल्या असत्या, किंवा हायकमांडला निर्णय घ्या अस म्हटलं असत तर गोष्ट वेगळी असती. किंवा हे कृत्य घडल्यावर त्यांनी निषेध नोंदवला असता तर आम्हीही त्याच पद्धतीने केल असत. पण नाही ना तसं काही घडल. आता तुम्ही आमच्या मिरवणुकीवर वाद्ये वाजवता म्हणून दगडफेक करायची. आणि पोलिसांनी आमच्यावर शांतता भंग करतात म्हणून केसेस टाकायच्या. बर तुमचा गुरु म्हटला की फाशीला रांग. आमच्या राक्षसंंच्या चित्रांची स्पर्धा तुम्ही भरावयाची. बर पण आम्ही नाही हं काही बोलायचं. पाटलीण बाई जगभर फिरून येणार आणि आम्हाला स्वातंत्र्य दिनाला दिव्य संदेश देणार की आतांवाद्याला धर्म नसतो. बाईना सही करताच येत नाही बहुतेक. आमच्या मुंबईत जनाब कसाब चौथी नापास मुंबई दर्शन घ्यायला येणार. आल्यावर जनाब कोणावरही गोळ्या झाडणार. बर जिथे जनाब उतरले होते त्याच ताज हॉटेल समोर गेट वे इंडियाला त्याच वेळेस मी माझ्या मित्रांसोबत फेरफटका मारत असायचो. तिथ असलेल्या डी.एन. रोडवर माझ्या याआधीच्या कंपनीची इमारत होती. पुण्यातल्या एका जणाला मुंबईत त्याच दिवशी नवीन जॉब लागला होता. तो आनंदात त्याचे ऑफर लेटर घेऊन पुण्याला येण्यासाठी सीएसटी आला. तिथे जनाब कसाब होतेच. त्याला गोळ्या दिल्या. काय सांगायचं त्याच्या आईला? की कसाब सॉरी जनाब आमच्या तुमच्या पैशाची बिर्याणी खातो आहे.
बर पण कोणीही चुकून त्याला किंवा गुरूला इस्लामी आतंकवादी म्हणणार नाही. कारण आपला देश निधर्मी ना. मग धर्मच नाव काढायचं नाही. आणि हो हे सगळ घडत असत तरी तुम्ही आम्हाला शांत राहा अस दटवायाच. तुम्ही दोन पोलिसांना ठेचून मारायचं. तिथे पोलीस ठाणे उभे राहून द्यायचं नाही. पण आम्ही शांत राहायचं. उद्या कधी जगात कुठेही काही घडल तर तुम्ही आमची घरे दुकाने जाळायची. आमच्या बहिणींना उचलून न्यायचे. पण तेव्हाही आम्ही शांत राहायचे. मग तो झाला तुमचा निषेध. बर हे सगळ विसरायला आम्ही तयार आहोत. पण शिवाजी महराजांनी अफझलचा कोथळा कसा विसरायचा. मग तुम्ही आमच्या बहिणीला विष पाजायचे. एकाला भोसाकायाचे. मूर्त्या तोडायच्या.पण आम्ही चिडलो की आहेच पोलीस. ह्या पोलिसी कुत्र्याला आमचाच लचका तोडता येतो. कारण आता पर्यंत आम्ही शांत राहत आलो. तिकड भिवंडीत किंवा मालेगावात नाही काही करता येत ह्या कुत्र्याला. शेपूट घालतो ना. बर आमच्यातील कोणी काही फुसका बॉम्ब देखील उडवला की ‘हिंदू अतिरेकी’. मग कुठे जात निधर्मीवाद कोणास ठाऊक?

स्वतःवर ताबा

स्वतःवर ताबा ठेवणे, कदाचित जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे, सकाळी साखर झोपेतून उठतांना ते रात्री विचार चक्रे थांबवून शांत झोपण्यापर्यंत स्वतःवर ताबा ठेवण्याची कसरत करणे फारच जिकीरीचे काम असते. कदाचित, काही गोष्टीत स्वतःवर ताबा ठेवणे काहींना सहज शक्य असेल. पण, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा असून देखील एखाद्या विशिष्ट कारणामुळे ती गोष्ट न करण्याचे बंधन घालणे खुपच कठीण असते. आता फक्त स्वतःवर बंधन घालणे, याचाच अर्थ स्वतःवर ताबा असणे असा नव्हे.
शाळेत जाणाऱ्या एखाद्या मुलाला जेवढा अभ्यासाचा कंटाळा येतो तेवढाच कंटाळा विकेंडच्या दिवशी ‘काम’ करणाऱ्या एखाद्या कामगाराचा असतो. खर तर ‘कंटाळा’ हा एक वेगळा विषय आहे. अगदी साधे उदाहरण, वाहन चालवतांना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे. हेही फार अवघड. एखादा वाहन ‘वीर/वीरांगना’ भुर्रकन कट देवून अथवा कुत्सित नजरेने पुढे जाते. त्यावेळी, स्वाभाविक घडणारी प्रतिक्रियेवर ताबा ठेवणे तेवढेच कठीण असते. वाहनाचा वेग वाढवण्याचा अथवा वेगात वाहन चालवण्याचा मोह आवरणे. हे देखील स्वतःवर ताबा असण्याचे एक लक्षण आहे.
आता स्वतःवर ताबा ठेवण्याचा काय फायदा? या प्रश्नाचे उत्तर ताबा ठेवण्यानंतरच कळू शकते. एखाद्या न पटणाऱ्या मुद्यावर. किंवा एखादा न पटलेला विषयाकडे पाहून वाढणारा अथवा येणारा राग. आणि त्यावेळी स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी लागणारी मेहनत फारच अवघड असते. एखादी न पटणारी गोष्ट दुर्लक्ष करणे. ही देखील एक खूप मोठी कला आहे. स्वतः शांत राहणे. अथवा कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा तोल ढळू न देणे. हे स्वतःवर ताबा असल्याचे लक्षण आहे. परंतु याचा अर्थ, एका गालात चापट खाल्ल्यावर दुसरा गाल पुढे करणे. किंवा स्वस्थ बसणे असा नव्हे. अन्याय सहन करणे याचा अर्थ स्वतःवर ताबा आहे असा देखील मुळीच नव्हे.
स्वतःवर ताबा ठेवल्याने कदाचित वेगात वाहन चालवण्याची मजा मिळणार नाही. परंतु, वाचणारे पेट्रोल आणि त्याहून पुढे जावून वेगाच्या भरात घडण्याची शक्यता असलेला अपघात निश्चितच टळू शकतो. न आवडणारे विषय किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीं विषयी किंवा त्यांच्या वागण्याविषयी स्वाभाविक उमटणारी ‘प्रतिक्रिया’ देण्याची पद्धतीवर ताबा ठेवल्यास भविष्यात त्याचा निश्चितच फायदा होवू शकतो.
हेही तितकेच खरे की, स्वतःवर ताबा ठेवणे अथवा नियंत्रण ठेवणे, बोलण्या इतके किंवा फुकाचे सल्ले देण्याएवढे सोपे नक्कीच नाही. काहींना कदाचित काही विषयात स्वतःवर ताबा मिळवणे शक्य झाले असेल. परंतु, स्वतःवर संपूर्ण ताबा मिळवणे हे हिमालयात तपश्चर्या करण्या इतकेच कठीण काम आहे.

पासवर्ड

इतक्या वेबसाईटची अकौंट झाली आहेत ना! आणि प्रत्येकाचे ते यूझर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे दिव्य आहे. आज ते जीमेलाचा पासवर्डमध्ये गोंधळ झाला होता. आठवतच नव्हता. सहा महिन्यांपूर्वी युझर नेम आणि पासवर्डसाठी एक एक्सेलची फाईल बनवून त्यात आठवेल तितके यूझर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवले होते. आणि त्याही फाईलचा पासवर्ड आता आठवत नाही. आता सगळेच पासवर्ड सारखे करायचा प्रयत्न केला होता. पण युझर नेमचे झंझटमुळे शेवटी सोडून द्यावी लागली.
दुसरी भीती अशी वाटत होती की जर उद्या कोणाला पासवर्ड समजला तर सगळीच अकौंट चोरली जातील. वहीत किंवा कुठे नोंद करावी तर तीही कोणी पाहिलं याची भीती. घराच्या संगणकावर मी पासवर्ड रिमेंबर करून ठेवले होते. परंतु आज त्या ‘सी क्लीनर’ नावाच्या सॉफ्टवेअरने सर्व काही क्लीन केली. त्यामुळे आज सगळ्याचं ठिकाणी पासवर्डचा गोंधळ झाला आहे. ‘फोर्गेट पासवर्ड’च्या ठिकाणी क्लिक करून करून आता माझीही त्या आमिर खान प्रमाणे ‘शॉर्टटर्म’ मेमरी तर झाली नाही ना याची शंका येते आहे. बर, माझेही पासवर्ड ठेवण्याची सवय मित्रांप्रमाणे असती तर चांगले झाले असे वाटते आहे. त्यांचे पासवर्ड म्हणजे आवडत्या मुलींची नावे. मी तर किती तरी जणांची त्यांच्या समोर त्यांची अकौंट उघडी करून दाखवली आहेत. अजून फार काय वेगळे करणार तर ते स्वतःची जन्म दिनांक किंवा मोबाईल नंबर पासवर्ड म्हणून टाकणार. परवा माझ्या लहान बहिणीशी बोलतांना ती मला तीचा मेल अकौंटचा पासवर्ड विचारात होती. आणि दोन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण देखील. त्यावेळी मी त्यांना विसरभोळे म्हणून हसत होतो.
आज माझीही तीच परिस्थिती झाली अस म्हणावे लागेल. मध्यंतरी माझ्या एका एटीएम कार्डचा पिन नंबर असंच विसरून गेलो होतो. तीन एक महिने कार्डचा वापरच नाही. मग कशाचा आठवतो आहे लवकर! तीन महिन्यांपूर्वी एक्सेस बँकेच्या अकौंटचा ट्रॅन्सशन पासवर्ड विसरला आहे. तो अजूनही आठवला नाही. बॅंकेत फोन केला तर आमच्या शाखेत येऊन फॉर्म भरा अस सांगण्यात आल. असो, पासवर्ड लक्षात राहिलं असं ठेवावा म्हटलं तर ‘ती’चे नाव आठवते. तसे अजूनही काही पासवर्ड तिच्याच नावाने आहेत. पण मग उगाचंच भूतकाळ आठवतो. एकतर ह्या पावसाळ्यात आणि विशेषतः पाऊस चालू असतांना अनेक चित्र विचित्र गोष्टी मनात येत असतात. नको त्या विषयावर बोलायलाच नको. जाऊ द्या रिसेट केलेत आता पासवर्ड. पण पुन्हा विसरू नये म्हणून काय करावं ते अजून सुचत नाही आहे. स्मरणशक्ती वाढवावी लागले असेच वाटते आहे. माझा मोबाईल नंबर सोडला तर बाकी कोणाचाच मोबाईल नंबर माझा तोंडपाठ नाही. बहुतेक पासवर्ड न विसरणे हेच काय ते उत्तर या प्रश्नावर वाटते.

हेडफोन

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत.
आता हे ‘मोबाईल मॅन’ आपल्याशी अस कानातल न काढता बोलले तर राग येणार नाही का? तसे मी देखील दिवसभर डेस्कवर असाच कानातले घालून बसलेलो असतो. पण त्याचे एक कारण म्हणजे माझ्या समोरच्या कॉलममध्ये बसणाऱ्या टीम मधील मुली असले विनोद करतात ना, की ऐकून हसायला येत. आता त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. मग मी असाच हसायला लागलो तर ते विचित्र वाटेल. म्हणून मी कानातले घालून बसतो. पण अतिरेक नाही करत. कोणी माझ्याकडे आले, की ते काढून ठेवतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. आणि दुसरे कारण म्हणजे हे बाजूचे पहिलवान फोनवर मिटिंग करतात. आणि डेस्कवरील फोनवर लाउड स्पीकर ऑन करून बोलतात. असो, त्यांचा काय दोष त्यांना मिटिंग रूमच मिळत नाहीत. त्यामुळेही मी मला त्रास नको म्हणून मग कानातले वापरतो.
पण रस्त्यातून चालतांना त्या कानातल्यांची काय मोठी आवश्यकता असते ते कळत नाहीत. असे मोबाईल मॅन येत जाता अनेकवेळा मी बघितले आहे. थोडे विचित्रच वाटते. जेवतांना देखील मी काही ‘मोबाईल मॅन’ बघितले आहेत. आवाज किती यावर काय बोलत नाही. आता कानातले गाणी ऐकतांना दुसर्याशी बोलतांना त्यांचा व्हॉल्यूम अचानक वाढतो. का वाढतो यावर काही बोलून फायदा नाही.
थोड्या वेळापूर्वी मी फ्रेश होण्यासाठी म्हणून त्या बाथरूममध्ये गेलो होतो. मी आरश्यात बघून तोंड धूत असतांना एक ‘मोबाईल मॅन’ कानातील घालून टायलेट मधून बाहेर येतांना पहिला. पाहून थक्कच झालो. आता थक्क होण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा काही पर्यायाच नव्हता. जगात प्रेम कोणावर करावं आणि कुठे करावं याला काही ‘नियम’ नसतात. अस ऐकल होते. दोन दिवसापूर्वी तो रामूचा ‘निशब्द’ पाहतांना ढोकळ्याचा एकही घास घशाखाली उतरला नाही. रामूची ही खासियतच आहे. खूपच विचित्र वाटत होते. पण आज तो ‘मोबाईल मॅन’ नाही नाही ‘टायलेट मॅन’ पाहून अजूनही किळसवाणे वाटत आहे. असो, लोकशाहीने प्रत्येकाला कुठेही काहीही आणि कधीही करायचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि शेवटी प्रत्येकाची इच्छा. कोण काय बोलू शकते?

लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित.
पण मला अप्सरे सारखी मुलगी हवी आहे. जी ला पाहिल्यावर मनात ‘ही माझी झाली तर..’ असा विचार येईल. आणि जी ला पाहिल्यावर दुसरे काहीच सुचणार नाही. आणि मनात दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचारही येणार नाही आणि इच्छाही होणार नाही. आणि ती सुद्धा फ़क़्त माझाच विचार करेल. जी माझ्याशी बायको नव्हे मैत्रिणी प्रमाणे राहिलं. माझ्याशी मस्ती करेल. पुतळा नको. म्हणजे कसं की, तिला आपण आज बाहेर जेवायला जाऊ या का अस विचारल्यावर ताबडतोप ‘हो’ म्हणेल अशी. किरकिर नको. तसे रोजही जाणे मला परवडणारे नाही. मला समजून घेणारी. अशी हवी मला. नाहीतर मग, दोघातील एक नाराज असेल त्या लग्नाला आणि त्या संसाराला काय अर्थ? काल माझ्या मित्राशी याच विषयावर बोलत असतांना तो म्हणाला. तसे माझ्या सर्वच मित्रांचे ‘लग्न’ बद्दल इतके निर्णय कसे काय पक्के आहेत हेच कळत नाहीत. तो म्हणत होता, जर बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी असलेली मुलगी केली तर त्यांना घरात रस असतो. आणि ते आपल्या आज्ञेत राहतील. त्यामुळे वादावादी होणार नाहीत. आणि जर प्रेम विवाह केला तर सगळेच ‘हात’ वरती करतील. कारण निर्णय दोघांचा असेल. आणि पुढे जाऊन दोघात वादावादी झाली तर कोणीच मिटवायला येणार नाही. आणि पुन्हा घरचे दोघांना नावे ठेवत बसतील.
पुढे तो मला म्हणत होता, कशाला खेळत बसला आहे. जी भेटेल तिला हो म्हणून लग्न करून टाक. बाकीच्या मित्रांचे सुद्धा थोड्या फार फरक सोडला तर असेच आहे. पण मला मुलीशी मतलब आहे. शिक्षण, व्यवसाय हे काय आयुष्यात सर्व काही नसते. दोघांची मन जुळली. एकमेकांना दोघे आवडतात हे देखील महत्वाच नाही का? आत्तापर्यंत आई वडिलांना मी कोणत्याच गोष्टीला कधी नाही म्हटले नाही. म्हणजे तशी हिम्मतही केली नाही. मुळात हिम्मत झालीच नाही. आणि त्यांचे निर्णय नेहमी अचूक असतात. त्यामुळे निर्णय नेहमीच फायद्याचे असतात. आणि ते देखील खूप चांगले आहे. माझेही सर्व लाड पुरवले आहेत. मला संगणक कोर्सच, संगणक, मोबाईल आता घर अशा गोष्टीत कधीच टाळाटाळ केली नाही. माझ्या निर्णयाला नेहमी पाठींबा दिला. खर तर माझ्यासारखा इतका फालतू मुलगा अशा ठिकाणी असण्याचे सर्वच श्रेय त्यांनाच आहे. मुळात मी एक शून्य आहे. ते आहेत म्हणून किंमत आहे. पण या निर्णयाच्या माझा खूप गोंधळ उडाला आहे. म्हणजे स्थळ पाहायला सुरवात जानेवारीत- फेब्रुवारी केली. त्यावेळी माझ्या मनात आई वडील जो निर्णय घेतील तो बरोबर असेल अस होत. आता माझ्या मनात खूप इच्छा वाढत आहेत. म्हणजे मी भाजी पाल्याप्रमाणे कधीच मुलींची ‘निवड’ केलेली नाही.
पण आता मला ती ‘अप्सरा मनामध्ये भरली’ आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर माझे आता मुली निवडण्याचा कार्यक्रम बंद झालेला आहे. मला दुसरी नको आता. असो, आता पाणी गळ्यापर्यंत आले आहे. वडिलांना मी फोनवर सोमवार संध्याकाळ पर्यंतची मुदत घेतली आहे. आता त्या अप्सरा सोबत बोलाण्यावाचून काही पर्यायाच नाही उरला आहे. सोमवारी तिच्याशी मी बोलेले. जर तिला माझ्यात रस असेल तर ती ही माझ्याशी पुन्हा बोलायचा प्रयत्न नक्की करेल. तसे मी विषय, संबंध आणि ओळख नसतांना देखील कोणाशीही बोलू शकतो. कालच मी एका मुलीशी बोललो. माझ्या मित्रांनी त्या मुलीशी बोलून दाखव अशी माझ्याशी पैंज लावली होती. हाहा! आणि मी ती जिंकली. पण ती अप्सरा समोर आली की हिम्मत जाते. पण मी नक्की बोलेल. आता नाही तर कधीच नाही.
चिंता नसावी, मला माझ्या ‘बोलबच्चन’वर विश्वास आहे. काहीतरी पिल्लू कारण काढून मी तिच्याशी दोन पाच मिनिटे नक्की बोलेले. आणि तिलाही माझ्याशी पुन्हा बोलायची इच्छा निर्माण करेल. आणि जर माझ्यासोबत पुन्हा ती स्वतःहून बोलली तर मग, त्या स्थळाला माझा ‘नकार’ पक्का होईल. नाहीतर निमुटपणे होकार देऊन हा विषय संपवून टाकेल.

टीव्ही आणि मी

दोन वर्षांपूर्वी मी मुंबईच्या एका आयटी कंपनीत रुजू झालो होतो. त्यावेळी मी माझ्या गिरगावमध्ये मावशीकडे राहायला होतो. तसा गिरगावात मी एकच महिना होतो. पण याच काळात माझ टीव्ही विषयीचे मत बनायला सुरवात झाली. कंपनीची अशी काही ठराविक वेळ नव्हती. कधीही या आणि आठ तास काम करून घरी जा. माझी कंपनी डीएन रोडवर होती. मला माझ्या मावशीचे घर ते कंपनी हे अंतर बेस्टने दहा मिनिटे आणि चालत २० मिनिटे. मी सकाळी दहाच्या सुमारास कंपनीत जायचो आणि ६:३० पर्यंत घरी यायचो. घरी आल्यावर फ्रेश होता होता सात वाजून जायचे. काय गप्पा होतील ते याच वेळेत. सात वाजले रे वाजले सगळे पहिल्या खोलीत टीव्ही समोर. मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून मी कधी काही बोलत नसायचो. त्यांचे ठरलेले कार्यक्रम सात ते दहा या वेळेत असायचे.
त्यांच्या बरोबर मलाही सासू आणि बायको नसताना त्यांच्यातील भांडण कळायची. त्या गोजिरवाण्या घरातील सगळी लफडी समजायची. बर ते सोडा. दहानंतर यांचे जेवायचं बेत. तोपर्यंत या मालिकांनी माझा फार डोक्याचा भाजीपाव केला असायचा. एक महिन्याच ते दिव्य कस बस सहन केल. कधी कधी मावशीने एखादा भाग पाहायचा राहून गेला तरी ती दुसऱ्या दिवशी फोन करून तिच्या मैत्रिणीला विचारायची. मग त्या विषयावर तासभर फोनवर. जेवताना त्यांचा तोच विषय. ह्याने असं केल त्याने तसं केल. सुरवातीला मला वाटायचं की हे चाळीतील लोकांबद्दल बोलत असावे. पण काही भाग पाहिल्यावर मीही समजलो. एका महिन्यानंतर माझ्या बोरिवलीच्या मावशीचे जुने घर मोकळेच होते. तिथ यातून सुटकारा मिळाला. पण कधी त्या मावशीकडे जाण्याचा योग आला तर तिथेही असलेच अनुभव. वर्षभरापूर्वी मी पुण्यातील एका कंपनीत रुजू झालो. राहण्याची व्यवस्था काकाकडे होती. पण इथ पण तेच सकाळी सकाळी काका टीव्हीसमोर, तो गेला की काकू, मग शाळेतून दुपारी माझे लहान बहिण भाऊ यायचे. मग ते टीव्हीसमोर. काका येण्याच्या दहा मिनिटे आगोदर ते टीव्ही बंद करायचे. पुन्हा काका संध्याकाळी आल्या पासून ते दहा-अकरा वाजेपर्यंत टीव्ही चालूच. जेवण पण टीव्ही समोरच. झोप देखील तिथेच.
याचा एक फायदा नक्की झाला की, घरातील भांडण कमी झाली. कारण कोणालाच बोलायचं वेळ नसायचा. एक मालीका संपली की दुसरी. आणि ते नसेल तर कार्टून चैनल आहेच. आणि ते नसेल तर जुने मराठी चित्रपट, आणि तेही नको वाटले तर चोथाही नसलेल्या विषयाचा अर्क काढणारी न्यूज चैनल आहेतच. मग कशाला कोण सोडतंय? पण या सगळ्या गोष्टींमुळे माझा टीव्हीतील रस कधीच निघून गेला. मित्राच्या रूमवर एकदा गेलो तिथे त्यांनी चैनल पाहण्यासाठी खास टीव्ही ट्युनर आणला होता. कोण मित्राच्या घरी गेलो की ते ये म्हणायचे आणि टीव्ही चालू करायचे. मग मला हे समाजात नसायचे की त्यांना टीव्ही बघायचा आहे की माझ्याशी बोलायचे आहे? सुट्टीत कोकणातील काकाकडे गेलो होतो. माझ्यामुळे निदान दोन – तीन दिवस टीव्ही बंद होता. माझ्या काकाने म्हणून दाखवले की आमचे आधी जेवणात गप्पा हा प्रकारच नव्हता. सगळे जेवायाला बसणार पण सगळ्यांचे लक्ष टीव्हीत. माझ स्वत:च घर घेतलं त्यावेळी मी ठरवलं होत की टीव्ही घरात आणणार नाही. पण काय करणार आईच्या हट्टापायी आणावा लागला. आणि केबलसुद्धा जोडून द्यावी लागली. पण हे शेजारचे आल्यापासून काही विचारू नका. बहुतेक शेजाऱ्यांचा जन्म चित्रपट गृहातील असावा. अशी शंका येते. त्यांचे बोलण्याचे स्वर आणि टीव्हीचा आवाजाला तोड नाही. का त्यांची दवंडी देणाऱ्याच्या कुळातील हेच समजत नाही. या सगळ्या प्रकारामुळे माझ डोक निदान ठीक राहत हेच आश्चर्य मानायला हव. असं माझी आणि टीव्हीची मालिका कधी खंडित होणार देव जाणे. का तीही ‘चार पाच दिवस सासूचे’ आणि ‘दामिनी (कधीही न संपणारी)’ किंवा ‘असंभव (ज्यात काहीही संभव)’ अशी चालू राहणार?. याच उत्तर मी काही पुढील भागात वगैरे देणार नाही आहे. किंवा ब्रेकिंग देखील देणार नाही आहे. किंवा प्रीमियर शो करणार नाही आहे. पण सध्याला तरी दस का दम प्रमाणे चालू आहे.

काय करायचं या परप्रांतीयाचं?

दुधात भेसळ करणाऱ्या दोन आंध्र प्रदेशातील दोन तरुणांना काल पिंपरीत पोलिसांनी अटक केली. एक आहे बक्तुल रामचंद्र गिरी आणि दुसरा उमेश कृष्णा दांडे नामपल्ली. दोघेही खराळवाडी मधील साईकुंज इमारतीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत राहणारे. रोज सकाळी साडेचार वाजता एका डेअरी मधून दीडशे लिटर दुध खरेदी करून अजमेर मधील एका ग्राहकाला काही पिशव्या त्याच किमतीत विकत असत. काही पिशव्या एका बाजूने फोडून त्यामधून दुध काढून, तेवढेच पाणी पिशव्यात भरून त्या सील करत असत. पन्नास लिटर दुध मागे दहा लिटर अतिरिक्त दुध हे निर्माण करत असत. चिखली आणि मोरेवस्ती येथील हॉटेल, चहाच्या टपऱ्या या ठिकाणी ते विकत असत. रोजचे निदान ३००-५०० रुपये सुटत असत.
पुण्यात आजकाल जिथे बघा तिथ हीच मंडळी आहे. कुठून येतात आणि कधी येतात ते देखील कळत नाही. पहिल्या पावसानंतर कुत्राच्या छत्र्या उगवतात ना तशा इथ रोज नव नवीन झोपडपट्ट्या निर्माण होतात. मग फुटपाथ काय आणि मोकळ्या सरकारी जागा काय सगळी ह्यांच्याच बापजाद्याची मालमत्ता. कोणी विचारात नाही. आणि कोणी हाकलत नाही. कोणी काही करायचं ठरवलं तर लगेच मानव अधिकारवाले आहेतच की. बर शाळा यांच्या बापानी पण नाही पाहिलेली. मग टाक सिड्याची आणि गुटका, पान सुपारीची हातगाडी. कुठेही सुरु करा. कोण हटकणार नाही. कुठेही आणि कसेही राहणार. पण सरकार त्यांची काळजी घेणार. हे चोऱ्या करणार आणि पोलीस यांना पकडणारच नाहीत. आपल्या करांच्या पैश्यातून रस्ते, फुटपाथ बांधणार. आणि मग हे परप्रांतीय झोपड्या बांधणार. मग एवढ्यावर याचं भागणार नाही. मग भेसळी करणार. सगळीकडे हेच. विषात पण भेसळ करतील. पण यांना कोणी काही बोलणार नाही. काही वर्षांपूर्वी सिंहगडला एक रेव्ह पार्टी प्रकरण फारच गाजलं होत. त्यात पण हे परप्रांतीयच. एका पोलिसाला मध्यंतरी पुण्यात गाडीने चिरडण्याचा प्रयत्न करणारा म्हातारा पण परप्रांतीयच. मध्यंतरी पुण्यात काही हत्या झाल्या त्या देखील करणारे परप्रांतीयच. काय करायचं आता या पराप्रांतीयाचं?

निर्णय

बायको’चा फोन आलेला. म्हणाली ‘घटस्फोट नको करूयात’. बर, मी नको म्हणालो तर अप्सरापासून दूर जाणार. आणि ‘हो’ म्हणालो तर, या इथे ‘मेव्हणी’ सोबत राहावे लागणार. पण आता फरक फक्त एवढाच असेल की, आधी मी ‘भाड्याच्या’ घरात होतो. होतो कसला, म्हणजे ‘न घरका ना घाटका’ होतो. ना मेव्हणीचे घर माझे होते. आणि ना बायकोचे घर माझे होते. थोडक्यात, बायको आता ‘घरात’ घ्यायला तयार झाली आहे. पण रहायचे मेव्हणीच्या घरी. तस मी तिला बजावलं की, मला दोन स्थळांचा होकार आहे. बघुयात ‘हुंडा’ किती देते ती.
घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर तिला माझी किंमत समजली. असंच असते, जेव्हा कोणी आपल्या जवळ असते त्यावेळी त्याची आपल्याला कधीच किंमत वाटत नसते. दूर गेल्यावर जाणीव होते. चला बर आहे, माझ्या ‘ही’ला म्हणजे बायकोला लवकर जाग आली. काय करावं, ते कळेनासे झाले आहे. निर्णय कोणता घ्यावा? पहा, पहिले ‘स्थळ’ म्हणजे ती कन्या खूप सुंदर आहे. भारतात तिचे नाव आहे. म्हणजे भारतीयच आहे. पण ती मला ‘दोन वर्षे’ घटस्फोट देणार नाही असा ‘करार’ कर म्हणते आहे. इन्शुरन्सचा तिचा स्वतःचा बिझनेस करते. दुसरी ‘नवतरुणी’ आहे. तिचे ओबामाच्या गावाची. तस माझी ही ‘मेव्हणी’ देखील ओबमाच्याच गावाची. पण दोघीत काहीच काहीच तुलना होवू शकत नाही. ही माझी मेव्हणी ‘फॉरेनर’ आहे. आणि हिचे बर्याच देशात बंगले आहेत. असो, मेव्हणी म्हणून फार कोडकौतुक करणार नाही.
आताच बायकोचा फोन येऊन गेला. मला मेव्हणीच्या ‘ह्यांच्याशी’, म्हणजे डीएम. आता म्हणजे म्हणजे काय ”डेडीकेटेड माणूस’ बरोबर हुंड्याच्या बोलणी करून घे बोलली. टाकलाय पत्र त्या माणसाला ‘मुहूर्त’ काढा ‘बैठकीचा’ म्हणून. सकाळपासून बायकोची सारखी फोनाफोनी आणि ‘संदेसे’. त्यामुळे वैताग आला आहे. ते एक गाणे आहे न ‘संदेसे आते है, हमे तड्पाते है|’ तस झालाय अगदी. प्रश्न आता असा आहे की, मी कुणाला हो म्हणू?. मेव्हणीचे नाव खूप मोठे आहे. पण हे हक्काचे ‘घर’ नाही. आणि हे घरात देखील घ्यायला तयार नाही. बर बायकोशी माझी काहीच संबंध नव्हते. हो खरच! फक्त महिन्यातून एक दिवस सबंध यायचा. बर बायको देखील सुंदर आहे. पण, तिनेही कधी घरात घेतले नाही. ‘विवाहित’ असून देखील ‘अविवाहित’. काय उपयोग?
सोडा, मुद्याचे बोलू. मला इथे मेव्हणीच्या पीएमने त्याच्या चुका लपवण्यासाठी, माझ्यावर ‘ब्लेमगेम’ केली. ‘गेमाड’पंथी कुठला! आता हा काय माझा पहिला ‘विवाह’ थोडीच होता. त्याची ‘गेम’ त्याच्या सकट त्याच्या ‘टीम गेमाड’वर उलटवली. तेव्हापासून इथे ‘सासुरवास’ सुरु झाला. बर, ही मेव्हणीने इथे आल्यापासून खूपच फडतूस काम दिलेले. त्यामुळे मी इथे गेल्या एका वर्षापासून ‘पिकनिक’ करीत आहे. बर, सगळ ठीक होते. पण अचानक एके दिवशी ती अप्सरा आली. आणि सगळंच बदलून गेल. अरे आज ती माझ्या डेस्कवर आलेली. आज किती सुंदर दिसते आहे ती! आहाहा! आणि काल.. ती खूप खूप सुंदर. त्यामुळे हे हक्काचे घर असावे खूप वाटायला लागले. बर ते पहिले स्थळ आहे ‘घरंदाज’. पण तिथेही काम काही चांगले देतील याबद्दल शंका आहे. नाहीतर तिथेही ‘पिकनिक’ व्हायची.
त्यामानाने ते दुसरे स्थळ मला योग्य वाटते. मान्य आहे की, तिच्या घराची परिस्थिती नाजूक आहे. परंतु काम चांगले असेल. निदान अशी पिकनिक तर नसेल. काय करू? आणि आज बायकोचा फोन आल्यावर गोंधळात आणखीन वाढ झाली. आता हीच ऐकल तर अप्सरा सोबत राहण्याचा ‘बोनस’. बाकी, फार काय फायदा होईल अस वाटत नाही. निर्णय कोणता घेऊ?

ती ती आणि ती

काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे.
तशी सुट्टी आहे. पण अजूनही ती असल्याचा भास होतो आहे. हे सगळ ते दोन आठवड्यापूर्वी तिच्या एका ‘फोन’ची कमाल आहे. देव खरच खूप चांगला आहे. मी म्हटलेलं ना. एकदा मी आणि माझा मित्र दुपारच्या वेळी ब्रेक आउट रूममध्ये बसलेलो. त्यावेळी ती फोनवर बोलत तिथे आलेली. खर तर तिच्याच बद्दल मी माझ्या मित्राशी बोलत होतो. तिच्या बोलण्यावरून तिचा संगणक बिघडल्याचे समजले. फोन झाल्यावर तिला मी तिच्या संगणकाबद्दल विचारलेल. मग जवळपास दहा पंधरा मिनिटे गप्पा मारलेल्या. माझे मित्र खूप चांगले आहेत. म्हणजे ती माझ्याशी बोलत असतांना, कधीच नाक खुपसत नाहीत.
दुसर्या दिवशी बोलता बोलता तिला एका अँटी व्हायरस बद्दल सांगितले. तर तिने त्याचा मला सेटअप मागितलेला. त्याच्या पुढच्या दिवशी मी तिला पेन ड्राईव्हमध्ये तो आणून दिला. तिने तो मागील आठवड्यात सोमवारी आणून दिला. तिला विकएंड बद्दल विचारलेल त्यावेळी म्हणाली, संगणक आता रिपेअर झाला आहे. आणि अजून काय केलस विचारल्यावर म्हणाली, मी एक चित्रपटांची डीव्हीडी विकत आणली. तिला म्हटलं, हा पेन ड्राईव्ह पुन्हा घेऊन जा आणि मला ती डीव्हीडी यात कॉपी करून दे. तर म्हणाली मी पुढच्या आठवड्यात घेऊन जाईल. ‘का’ विचारल्यावर बोलली, मी बाहेर फिरायला जाणार आहे.
तिने डेस्कवर गेल्यावर पिंग करून ‘मी पुढच्या आठवड्यात नक्की तुझा पेन ड्राईव्ह घेऊन जाईल’. अस म्हणाली. तिला म्हणालो ‘माझ्याकडे सुद्धा काही चित्रपट आहेत’. तर तिने कोणते विचारल्यावर आपले दोन चार चित्रपटांची नावे सांगितली. ती म्हणाली, इंग्लिश नको. हिंदी भाषांतरित आहेत काय? तिला ‘हो’ म्हटल्यावर ‘क़्वलिटी कशी आहे?’ अस तिने विचारलं. तिला म्हणालो ‘खूप चांगली नाही पण, चांगली आहे’. तर ठीक आहे बोललेली. असो, तो आठवडा खूपच जालीम होता. संपतच नव्हता. सारखी तिची आठवण यायची. न झोप यायची. आणि आली तरी स्वप्नात तीच असायची. खरच खूप बेजार झालेलं. सोमवार कधी येतो अस झालेलं. पण तो मागील आठवड्यातील सोमवार, यार ‘बुट्टी’ झाली.
मंगळवारी आलो तर तिचा पहिला प्रश्न तोच ‘काल कुठे होतास?’. बर मी टाईप करतो तोच तिचे त्या कम्युनिकेटरवर अजून दोन चार प्रश्न. मग जो शेवटचा प्रश्न त्याचे उत्तर दिले. पण खूप छान वाटलेलं. म्हणजे तिच्या ‘मी नव्हतो’ ही गोष्ट लक्षात आलेली. मी त्या दिवशी म्हणजे मागील मंगळवारी हार्ड डिस्क ऑफिसमध्ये घेऊन आलेलो. पण ती उद्या नेते बोलली. ती हार्ड डिस्कवारी सलग तीन दिवस करावी लागली. परवा ती माझी हार्ड डिस्क घेऊन गेली. अबे, मी तेच तेच उगाळतो आहे. असो, किती छान आहे ती! काल मी सकाळी कॅन्टीनमधून फ्लोरवर आल्यावर डेस्ककडे जातांना नजरानजर झालेली. माझ्याकडे पाहून हसली. यार, तिला हसतांना पहिले की, कलिजा खलास होतो. नंतर मी डेस्कवर बसल्यावर मला पिंग केले. आणि तिने पहिलाच बॉम्ब टाकला.
मला म्हणाली ‘चांगला दिसतो आहेस’. खरंच ते पाहून हार्ट अटॅक येतो की काय अस झालेलं. तिला स्माईली टाकून ‘धन्यवाद’ म्हणालो. आणि तिला ‘आणि तू सुद्धा’ म्हणालो. ती ‘मी म्हटले म्हणून म्हणालास, हो ना??’ अस बोलली. मी काय बोलू? ती इतकी सुंदर आहे, ती इतकी गोड स्वभावाची आहे. तिची नजर म्हणजे!!! ती!!! तिला म्हणालो ‘नाही नाही, असो’. तिनेही स्माईली टाकून ‘असो’ म्हणाली. मी स्माईली टाकल्यावर, तिनेही स्माईली. मला म्हणाली ‘वाद नको, मी हे मान्य करते की, मी सुंदर आहे’. नंतर थोड्या हार्ड डिस्क मधील चित्रपटांच्या गप्पा झाल्या. नंतर ती सांगत होती. दिलेली सीडी.. अरे सीडी बद्दल सांगितलंच नाही ना मी! तिला एक्स सिक्स मोबाईलचे मोडॅम ड्रायव्हर हवे होते, तिच्या मोबाईलचे. यार तिने दोन दिवसांपूर्वी पुन्हा तो ‘एक्स सिक्स घेतलास का?’ अस विचारलेलं. काय यार, तिसऱ्यांदा झाल अस. इतकी छोटी मी गोष्ट अजून करू नाही शकलो.
मग परवा सकाळी तिला मी पिंग करून सांगितलं की, माझ्याकडे दोन बातम्या आहेत. एक चांगली आणि दुसरी वाईट. तिने विचारल्यावर, तिला म्हणालो, मला ती एक्स सिक्स मोडॅम ड्रायव्हरची सीडी मिळाली. आणि तिने वाईट बातमी विचारल्यावर, तिला म्हणालो ज्याने मला ही सीडी दिली ना, तो म्हणाला की ह्या सीडीत प्रॉब्लेम आहे. पण तिला म्हणालो, एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. नंतर त्या दिवशी ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. किती छान! पण पुन्हा ‘तुम्ही’. सोडा ते! ती सीडी घेऊन गेली. परवा संध्याकाळी हार्ड डिस्क घेऊन गेली. काल बोलत होती. तेव्हा म्हणाली ‘तुझा मित्र बोलला ते खर आहे. त्या सीडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. नेट कनेक्ट होत नाही’. मी तिला दुसर्या मित्रांकडे आहे का ते पाहतो अस म्हणालो. तर ‘नको’ म्हणाली. पुढे बोलली, मी अजून एकदा प्रयत्न करून पाहते. आणि सोमवारी तुला सीडी देते म्हणाली. मला सांगत होती की तिने माझ्या ‘हार्ड डिस्क मधील तुझ्या बहिणाबाईचे फोटो पहिले, ‘सॉरी’ म्हणत होती. यार, किती गोड आहे ती! अप्सरा खरंच खूप छान आहे. दिसायला सुद्धा आणि मनाने सुद्धा. तिला म्हणालो हरकत नाही.
मला म्हणाली ‘तुझी बहिण अगदी तुझ्यासारखी दिसते’. आता बहिण माझी म्हटल्यावर अस असणारच ना! ती जरी चुलत बहिण असली तरी. माझ्या बहिणाबाईचे ‘हे’, म्हणजे माझे ‘दाजी’ हिंदीत काय बोलतात ‘जीजू’ हॅंडसम दिसतात अस बोलली. खर तर खूप हॅंडसम आहेत. तिला ‘हो’ म्हणायच्या ऐवजी मी चुकून ‘हम्म’ म्हणालो. काय माहित काय अर्थ काढला. मला म्हणाली ‘काय?’. मी तिला ‘हॅंडसम आहेत, स्माईल’ टाकली. ती ‘हो’ म्हणून ‘त्या दोघांचे लव्ह की अरेंज मेरेज झाले?’ अस विचारले. ती पुन्हा मी काही म्हणायच्या आत ‘माझ्या मते, अरेंज’. मी तिला ‘लव्ह कम अरेंज’. माझ्या बहिणाबाईची, मैत्रिणीचा तो भाऊ होता. अस सांगितल्यावर, ती ‘वॉव’. मला म्हणाली ‘तू देखील आता बहिणीची मैत्रीण शोध आणि लग्न करून टाक’. मला म्हणाली ‘तुला राग येणार नसेल तर एक विचारू का? तुझ किती वय आहे?’ मी आपला ‘२५’. आता १९८५ जन्मवर्ष म्हणजे पंचवीस पूर्ण ना. थोड्या फार हार्ड डिस्कबद्दल गप्पा झाल्या. नंतर ती म्हणाली ‘नवीन शर्ट का?’ मी ‘नाही, जुनाच आहे’. मला म्हणाली ‘मला पर्पल कलर आवडतो, तुला कोणता रंग आवडतो?’. मी ‘मला सर्व रंग आवडतात. सर्व रंग समभाव’.
तिला म्हणालो ‘तुला खाण्यातील कुठला पदार्थ आवडतो?’. तर म्हणाली ‘फिश करी आणि भात’. तिला ‘गुड’ म्हणालो. ती ‘तू, पिठलं भाकरी आणि काय?’ खर बोलायचे झाले तर ‘हो’ म्हणणार होतो. पण टाळल. तिला ‘मेथी’ म्हणालो. मला म्हणाली ‘मला भाकरी नाही बनवता येत’. तिला मी ‘मला तर काहीच बनवता येत नाही’. काय बोलणार ती? ‘शेम’ करीत बसली. तिला म्हटलं ‘पण मोठे काम येते ना’. ती ‘तुला लाज वाटायला पाहिजे. मॅगी आणि चहा तरी? ‘. तिला म्हटलं ‘मला काही हरकत नाही, काहीही खायला’. मला म्हणाली ‘हे बर आहे. तू तुझ्या बायकोला सुखी ठेवशील’. तिला स्माईली टाकून ‘तुला काय बनवायला आवडते?’. तर म्हणाली ‘मला स्वयंपाक येतो. पण मला त्याचा कंटाळा आहे. कधी कधी मूड असेल तर करते छान!’ तिला विचारलं, खर तर मला माहिती आहे. पण तरी सुद्धा ‘तू डबा आणतेस?’. तर ती ‘हो, पण रोज रोज करायला आवडत नाही’. तिला म्हटलं ‘आता?’ तर म्हणाली ‘मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकाला एक बाई ठेवली आहे’. तिला म्हटलं ‘तुला माहिती आहे का, की बाहेरच्या जेवणाने ताकद येत नाही’. ती ‘माहित आहे. मला बाहेरचे जेवण रोज रोज खायला नाही आवडत’.
मी ‘तू गॅस आणला आहेस का? म्हणजे तू स्वयंपाक कसा करतेस?’. तर बोलली ‘निश्चितच. काय तू पण? चुलीवर करणार का?’. मी ‘नाही, म्हणजे रूमवर अलाउ नसत ना. म्हणून विचारलं’. ती ‘कोण म्हटलं अलाउ नसत. आमचा फ्लॅट आहे.. पीजी नाही’. मग मी जरा त्या माझा आउटलुकचा झालेला प्रॉब्लेम विचारला तर म्हणाली, मला हे असले विषय आवडत नाही. पुन्हा आपले तिचे सुरु, ‘मला माहिती आहे तुला टेक्निकल गोष्टींचा फॅन आहे’. मग मी काय बोलणार? तिला म्हणालो ‘विषय बदल’. मग स्माईली टाकून बोलली ‘तुझा वाढदिवस कधी असतो?’ मी ‘२५ मे’. ती ‘ओह, पॉइण्ट नोटेड’. तिला म्हटलं ‘तू वाढदिवस कसा साजरा केलास? शॉपिंग?’. ती ‘नाही. आज मी जो टी-शर्ट घातलेला आहे न, तो वाढदिवसाला घेतलेला. कसा आहे?’. काय बोलू यार तिला? ती प्रत्येक ड्रेसमध्ये खूप खूप छान दिसते. तिला म्हटलं ‘छान. म्हणजे खूप चांगला आहे. पण पट्या पट्याचा का घेतलास?’. ती ‘मला पट्टे आवडतात. म्हणून’. मी ‘अच्छा’.
मी म्हटलं ‘तुझा वाढदिवस १५ला असतो ना. मी १६ला बाईक बुक केली’. मला वाटल ती विचारेल कोणती केली ते. पण ती उलट ‘अजून काय बाकी’. मी ‘खर तर, १५ ला गेलेलो. पण जायला उशीर झाला. शोरूम लवकर बंद झालेलं. असो’. यार त्या ‘असो’ ने घोळ केला. ते ‘असो’ पाहून म्हणाली ‘अबे, तू नाथ माधव आहेस का? की शशी भागवत?’ मी ‘का? काय झाल?’ ती ‘कारण तू सारख सारख असो असो वापरतो आहेस. ही ही! तुला माहिती आहेत का हे लेखक?’.  मी ‘नाही. मी वाचत नाही. मला आवडत नाही. खूपच बोरिंग..’. काय माहित भडकलीच, मला म्हणाली ‘तू बोरिंग, स्माईली. मला पुस्तके आवडतात. लाईक क्रेझी’. मी ‘अच्छा म्हणजे तुला आवडतात. तुला ते ई-पुस्तक (द ओल्ड म्यान एंड हीज गॉड – सुधा मूर्ती) हवे होते ना’. ती ‘?, मी ते घेईल. कदाचित आज’. तिला म्हटलं ‘ते पुस्तक मला मिळाले. तू नको घेऊ. पण माझ्याकडे आता नाही आहे. मी तुला ते सोमवारी देईल’. तर बोलली ‘ऐक, मी एका वाचनालयाची सदस्य आहे. मी ते तिथून सहजासहजी घेऊ शकते. मला त्या दिवशी हव होते. कारण फक्त त्यावेळी माझ्याकडे काही काम नव्हते’. मी काय बोलणार? ओके म्हणालो. काल मी उपास केलेला. इति श्री बहिणाबाई आज्ञा! दुपारी मित्रांना भेटायला कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी जिन्यातून निघालो. तर ती तिच्या मित्रांसोबत फ्लोरवर येत होती.
किती छान! यार तिचे हसणे. ती हसत हसत माझ्याकडे पाहून नुसता हात दाखवला. थोडक्यात, माझी स्टाईल मारलेली. नंतर तिची केटी सुरु झालेली. त्या एक काकू बाई तिला आणि त्या नारळाला केटी देत बसलेल्या. पण तो नारळ, एकदा श्रीमुखात किंवा श्री’कमरेत’ माझा हस्त किंवा पदस्पर्श घडून आणावा अस वाटत. कार्टून तिच्याकडे पाहतो. काय करू, अस कोणी तिच्याकडे अस पहिले की माझ पित्त खवळते. पण काय करणार.. बसतो आपला शांत. नंतर ती तिच्या मित्रांकडे जरा वेळ. जरा वेळ नाही जरा जास्तच वेळ गप्पा मारीत होती. कदाचित कामातून वेळ मिळाला की, अस करायची. मला खरच खूप बेकार वाटायला लागलेलं. यार, तिचे मित्र. काय माणस आहेत? ती इतकी छान स्वतःहून त्यांच्या डेस्कवर जावून ती गप्पा मारते. एकतर ह्यांना कोण काळ कुत्र भाव देत नाही. आणि ती इतकी सुंदर मुलगी, ते पण स्वतःहून जावून बोलते. तर जणू काय फार काम पडल आहे. कंपनीचे सगळे काम जणू ह्यांच्याच अंगावर पडले आहे असा आविर्भाव. ती खरच खूप चांगली आहे. संबंध कसे टिकवायचे, हे त्या तिच्या मित्रांनी तिच्याकडून शिकायला हवं. सोडा. मला त्यावेळी खूपच बेकार वाटायला लागलेलं. वाटल, ती फक्त एक साधा मित्र समजते मला. यार, ह्या डोळ्यांचे काही तरी करायला हवं. मी डेस्कवरून उठून वॉशरूममध्ये गेलो. थोडा फ्रेश झाल्यावर बाहेर येण्यास तो दरवाजा उघडणार. तेवढ्यात एक कार्टून. ते महा-कार्टून आहे. खूप जोरात दरवाजा विरुद्ध बाजूने ढकलला. थोडक्यात बचावलो. नाहीतर डोक फोडलच असते त्याने.
एकतर आधी नारळ, नंतर तिचे मित्र पाहून आधीच मस्तक बिघडलेलं. त्यात ह्या महा-कार्टूनचे ‘जलवे’. यार त्याला काही पद्धतच नाही. चूक घडो अथवा न घडो, सॉरी म्हणायची एक पद्धत असते. हे बिनबुडाचे पात्र तसंच गेल. बर मी त्याच्याकडे पहिले तर हे कार्टून माझ्याकडे रागात पाहत गेल. तसं त्याच हे नेहमीचेच आहे. आधीही दोनदा, मी माझ्या खुर्चीचा हात असतो ना. त्याचा नट निघालेला. तो लावत होतो. तर हे कार्टून धक्का मारून गेल. ह्यावेळी टाळक सरकलेल होत. मी मुठ आवळलेली. पण नंतर स्वतःवर ताबा ठेवला. यार, मी आतापर्यंत कधी कोणाशी भांडाभांडी नाही केली म्हणजे करूच शकत नाही अस नाही. डेस्कवर येऊन शांत बसलो. पण राग काही केल्या जातच नव्हता. पण नंतर तिने पाचच्या दरम्यान मला पुन्हा पिंग केल त्यावेळी खूप छान वाटलेलं. मला विचारात होती कधी निघणार वगैरे.. थोड्या तिच्या प्रोजेक्ट बद्दल गप्पा झाल्या. तिच्या कामाला वेळ लागणार होता. तिला घरी जायची घाई झालेली. नंतर तिने ते काम डीप्लोय करायला सुरवात केली. नंतर मी तिला म्हणलेलं ‘तुला एक गोष्ट सांगू?’ तर तीच ‘हो’. एकतर त्या कार्टूनचा राग काही केल्या जात नव्हता. म्हटलं ते कार्टून तिच्या प्रोजेक्टमधील आहे. उगाच तिला सांगितल्यावर तिला वाईट वाटायचे. तिला म्हटलं ‘प्लीज, रागावू नको. हे फक्त मी अनुभवलं आणि पाहिलेलं आहे’. ती ‘ओके. मी का रागावेल?. माझा तेव्हा मूड जातो, ज्यावेळी तू तुझ्या पद्धतीने माझी मदत मागतोस. जी की काही रिक्वयर नसते’. मी ते पहिले आणि तिला त्या कार्टूनबद्दल टाकणार तेवढ्यात माझा एक मित्र आला. मी त्याच्याशी थोडा वेळ बोलल्यावर तिला ‘तू नाहीस पण, तुझ्या प्रोजेक्ट मधील अनेक लोक स्वभावाने चांगले नाही’. अस टाकून वरती पाहतो ते ती माझ्या डेस्कवर. मग तिच्या कम्युनिकेटरचे स्टेटस पहिले तर अवे.
ती माझ्या डेस्कवर बसलेली. असो, आता जे बोललो ना तेच तिला सांगितलेलं. किती छान! मग राग गेला. ती मला मी या कंपनीत कधी परमनंट होणार ते विचारात होती. मी जॉब सोडला. आणि मला दुसरी कंपनी मिळाली अस बोलाव वाटलेलं. अगदी तोंडापर्यंत आलेलं. पण नाही बोललो. थोड्या वेळाने ती तिच्या कामासाठी गेलेली. नंतर पिंग करून सुद्धा बराच वेळ गप्पा चालू होत्या. जातांना मला तिने माझी ती हार्ड डिस्क दिली. यार, घरी निघतांना खूपच बेकार वाटलेलं. काय माहित तिला माझी आठवण आली असेल की नसेल. तसा निघतांना ती लिफ्ट मध्ये माझ्या शेजारी उभी होती. खूपच धडधड वाढलेली. आणि मस्त देखील वाटत होते. यार, आयुष्यात असा दिवस येईल अस कधीच वाटले नव्हते.
हुश्श! पण एकूणच खूपच छान! अरे!!! हे काय, किती बडबडलो?? दोन हजार शब्द.. बबब!! बस. फारच जास्त पकवले ना! पुन्हा इतके नाही करणार. पण मन आता शांत झाल आहे. आणि खूपच बर वाटत आहे.

क्षमा असावी.. महाराज

राजे आम्हाला क्षमा करा! खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल? कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं? वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा.
तुमच्या इतिहासाने कोणत्या मराठ्याच्या अंगातल रक्त सळसळणार नाही? छाती पहाडी आणि मनगटात हत्तीच बळ येणार नाही? महाराज वर्तमान असा आहे की, तुमच्या इतिहासात जातीची भिंग लावून लई मोठ्ठी शोधमोहीम चालू झालीय. मग काय, हा अमक्या जातीचा. काढा ह्याला बाहेर. इतिहासातून त्याची पाळमूळ तोडा. आधी सरकार करायचं. महाराज आमचा वर्तमान अंधारात चाललाय. रस्त्याचे प्रश्न सोडा पण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडते आहे. आमचे हुशार अर्थतज्ञ प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाची अवस्था एखाद्या रुग्णालयात अंथरुणाला खिळलेल्या सत्तरी गाठलेल्या म्हाताऱ्याची केलीय. बर, इतकी महागाई केलीय की. आमचं चिडणं देखील बंद होवून गेलंय. भाववाढ म्हणजे सरकारच खेळण झाल् आहे. कधी हे सरकार जातंय अस करून सोडलं याने.
पण इकड मात्र, आपले मावळे मंडळी. एकमेकांच्या जातीचा उद्धार करण्यातच मश्गुल. महाराज, यात भविष्य आहे का? तुम्ही स्वराज्य निर्माण केल. त्याच सर्वस्वी श्रेय फक्त तुम्हाला आहे. मग मी महाराजांच्या जातीचा. म्हंजी महाराज फकस्त माजे. अस बोलण्याला काय अर्थ आहे? आणि इतिहासात फकस्त माझ्याच जातीचे लोकांनी महाराजांना साथ दिली. उरलेली सगळी मंडळी जन्माला आलेलीच नव्हती. नंतर इतिहासात टाकली.
महाराज, खरंच यावर बोलायला देखील लाज वाटते. तिकडे शेतकरी शेतमालासाठी आंदोलन करत आहेत. अनेकांनी जगण्याला कंटाळून आत्महत्या केली. आता हे सुद्धा जातीच्या चष्म्यातून पहायचं म्हटलं तर अनेक सावज सापडतील. पण आपले मावळे काय जातीचा चष्मा सोडायला तयार नाहीत. बर राजे, सगळे असेच. हा त्याच्या जातीला आणि तो ह्याच्या जातीला नाव ठेवणार. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. देशात काय चाललंय. प्रत्येक प्रश्न किती गंभीर होत चाललंय. पण ते गेल् चुलीत. माजी जात आन फकस्त माझेच महाराज. महाराज, नाव तुमचे घेणार. आणि रात्री दारूत बुडणार. सकाळ झाली की, कालच्याच विषयावर. माझी जात म्हणजे लय भारी. आणि महाराज काय झाल् की, माफी मागयालाच हवी. बर ह्यांच्यात काय अस पहावं, तर फक्त ‘जात’. महाराज ह्यांच्या जातीच भूत डोक्यातून काढा. तसदी बद्दल क्षमा मागतो. जय भवानी| जय शिवाजी||

रेशन ते स्टेशन

माझ्या घराजवळील सरकारी ‘रेशन’ दुकानाच्या दुकानदाराला पोलिसांनी मागील महिन्यात पकडले. आता तोच नाही तर पिंपरी चिंचवड मधील अजून दोन सरकारी ’रेशन’ दुकानदारांना पकडले आहे. ते तिघे ‘रेशन’वरील वस्तू रेशनकार्ड वाल्यांना न विकता बाहेर इतर दुकानदारांना विकायचे. परवा त्या निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसच्या ‘महाराणी’ला पकडले. आता महाराणी यासाठी की तिचा रुबाब तसाच होता. आठवतो का मी रेशनकार्ड काढले तो किस्सा? सोडा, मी सांगतो. बहुतेक, हो! ८ मे २००९ मध्ये मी त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तो नवीन रेशनकार्डसाठी फॉर्म भरला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून! त्या तिथल्या दोन कर्मचाऱ्यांनी तो व्यवस्थित तपासला. आणि पंधरा जून नंतर या अस सांगितले.
मी जुलै महिन्यात चक्कर मारली तर बोलले, तुमचे काम अजून झालेले नाही. आठवडाभराने या. आठवड्याचे महिने झाले. पण त्यांच्या यादीत काय ‘हेमंत आठल्ये’ काही नाव येईना. मग म्हणाले निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसात जाऊन चौकशी करा. तिथे गेलो तर हेच. सुरवातीला म्हणजे निवडणुकीच्या कामात सर्वजण गुंतले आहेत. तुम्ही निवडणुकी नंतर या. निवडणूक झाल्यावर बोलले आता दिवाळी आली. ‘दिवाळी’नंतर चक्कर मारा. माझ्या ऐवजी माझी आई चौकशीला जायची. आता ह्या रेशनकार्डसाठी कोणती कंपनी मला दर आठवड्याला सुट्टी देणार होती? डिसेंबर उगवला. पण ह्यांचे आपले ‘यादीत नाव पहा, असेल तर बोला नाहीतर पुढच्या आठवड्यात चक्कर मारा’. आईचा रिक्षाने जाण्याचा पंचवीस आणि येण्याचे पंचवीस. पन्नास रुपये आठवड्याचा नाहक खर्च व्हायचा.
मी माझ्या जुन्या म्हणजे याआधीच्या कंपनीत जॉईन होण्याच्या एक दिवस आधी चक्कर टाकली. कारण माझ्याकडे लिव्हिंग प्रुफ नव्हता. वीज होती. पण त्याचे ‘मीटर’ आलेले नव्हते. आणि घराची कागदपत्र कंपनीला नको होती. बर, घर देखील स्वतःचे. त्यामुळे भाडेपट्टी, पत्र वगैरे कोण देणार? म्हणून म्हटलं रेशनकार्डच काम झाल तर ते प्रुफ म्हणून देता येईल. ६ डिसेंबर २००९ला त्या रेशनकार्डच्या ऑफिसात गेलो. जत्राच भरलेली. यादीत नाव पाहिले तर नव्हते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला विचारायला गेलो तर, तो ऐकून न ऐकल्या प्रमाणे करीत होता. त्याच्या बाजूच्या एका बाईला विचारले तर ती अंगावर पाल पडल्याप्रमाणे खेकसली. जाम भीती वाटलेली. पुन्हा यादीत नाव आहे का ते चेक केले पण यादीत नाव नव्हते. शेवटी पुन्हा त्या कर्मचारी बाईकडे जावून विचारले. तर जणू मी काही लाख दोन लाखाची रक्कम मागितल्या प्रमाणे माझ्याकडे पाहायला लागली. मला म्हणाली की, ‘तुमच्या एकट्याचेच काम नाही आमच्याकडे. यादीत नाव नसेल तर मी काय करू? पुढच्या आठवड्यात या. एकदा सांगितलेलं कळत नाही का?’. काय बोलणार त्या महिषासुर मर्दिनीला.
तिचा तो आवाज पाहूनच चिडीचूप झालो होतो. थोडा मागे सरकलो. कारण गर्दी, आणि रेटारेटी चालू होती. थोडा वेळ बाजूला उभा राहून तिथ काय चालेलेलं ते पहात होतो. सगळ्यांना ती कर्मचारी बाई तसेच उलट सुलट बोलून हाकलायची. कोणाचेच काम होत नव्हते. मग माझ्यातील ‘राज ठाकरे’ जागा झाला. पुन्हा तिला जावून विचारलं की, पुढच्याही आठवड्यात अस घडल तर काय?. ती पुन्हा तेच ‘समजत नाही का वगैरे’. तिला म्हटलं सहा महिने झाले. सगळे कागदपत्र देऊन सुद्धा कामाला इतका वेळ कसा लागतो?. तर म्हणाली, मला काय माहित?. तिला गोडीत सांगितले की उद्या मला नव्या कंपनीत प्रुफ म्हणून हवे आहे. नाहीतर, जॉबचा प्रॉब्लेम होईल. तर ती उलट ‘मग मी काय करू?’. तिला म्हटलं नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? तर बाजूच्या अर्जांच्या यादीत पाहत बोलली, तुमचा अर्ज सापडतच नाही.
मी अर्जाबद्दल विचारल्यावर माझ्यावर पुन्हा खेकसत, मी तुमचा अर्ज घेतला नाही. ज्याने घेतला त्याला जावून विचार. मग काय डोक आधीच ते सर्व पाहून भडकलेल. तिला म्हटलं, ठीक आहे. माझ्या जॉबचा प्रॉब्लेम झाला तर मी तुमच्या जॉबला प्रॉब्लेम करील. मला म्हणाली, जे करायचे ते कर. काही फरक पडत नाही. तिला म्हटलं, ठीक आहे. खाली जावून शंभर रुपयाचे रॉकेल आणतो. मग कुणाचाच अर्ज सापडणार नाही. बरच फर्निचर आहे. आणि कागदे सुद्धा. पुढचे पुढे.. जाऊ द्या यार..
मी तेच तेच काय उगाळत बसलो आहे. मग काय एका मिनिटात अर्ज सापडला. त्यावेळी त्या महाराणीची ‘सही’ राहिले वगैरे बोलू लागले. माझ पाहून तिथले बाजूचे लोक त्यावेळी मग हळू हळू तिच्यावर चिडू लागले. असो, तो वाढता राग पाहूनच मग माझी काम झटपट झाली.
ती महाराणी त्या निगडीच्या ऑफिसात दुपारी दोनला यायची आणि तीन साडे-तीनला छु. बऱ्याच लोकांचे खूप छोटे छोटे प्रश्न या अशा गोष्टींमुळे अडकून पडलेले. परवा तिने केलेली अफरातफर पोलिसांसमोर मान्य केली. तस त्या पुरवठा मंत्रीने बरेच प्रयत्न केले. पण शेवटी ह्यांनीच गुन्हा कबुल केला. वीस रुपये किलोची साखर ह्या सरकारी ‘रेशन’ दुकानदारांना आठ रुपये दिवाळीची सवलत मिळालेली. म्हणजे बारा रुपये किलो दराची साखर ह्यांनी बाहेर अठ्ठावीस रुपये दराने विकली. आणि लोकांना सांगितलं की मालच शिल्लक नाही. बर किती विकली तर काहीतर दीड एक टन. ह्या क्रेझी फोरने मिळून नऊ रुपये नऊ पैसे प्रती लिटर दराचे रॉकेल तीस रुपये दराने. ते सुद्धा हजार लिटरच्या पटीत आहे.
असो, एकूणच कोटीत घोटाळा झालेला. पण अजूनही त्यांची बाजू घ्यायला अनेक कर्मचाऱ्यांची लिंक आहे. कारण मालाची यादी असलेली फाईल ते कर्मचारी पोलिसांना देत नाही आहेत. ते क्रेझी फोर, म्हणजे ती महाराणी आणि ते तिघे दुकानदार थोड्याच आता जामिनावर बाहेर येतील आणि केस देखील दडपून टाकली जाईल. यावर मला विश्वास आहे. बाकी फार काही बोलायला नको, सर्वजण सुज्ञ आहेत. रेशन ते पोलीस स्टेशनचा प्रवास आता घडला आहे. पाहुयात, अजून काय होते ते! अरे हो! माझ्या अभिनंदनाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.

प्रेम रोग

आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
प्रेम रोगाचा इतिहास-
ह्या रोगाचा उगम कधी झाला हे सांगणे खूप अवघड आहे. यावर संशोधक संशोधन करीत आहेत. कदाचित मानवाच्या वंशाजांपासून याची सुरवात झाली असावी, अस त्यांचे मत आहे.
प्रेम रोगाची ठिकाणे-
हा रोग कोणालाही होवू शकतो. आजकाल टीव्ही सिरीयल आणि चित्रपटांच्या प्रसाराने लहान मुले देखील याला बळी पडू शकतात. सामान्य दिसणाऱ्या अथवा सुधृढ शरीर यष्टी असलेल्या कोणत्याही स्त्री/पुरुष/वृद्ध* [निशब्द- मधील बिग बी ला देखील या रोगाने पछाडलेले]/लहान मुले यांना हा रोग होवू शकतो. या रोगाचा प्रसार कुठेही होवू शकतो. परंतु शाळा, कॉलेज, रस्ता, चाळ, कंपनी, कॅन्टीन, सोसायटीच्या आवारात असा कुठेही हा रोग होवू शकतो.
प्रेम रोगाची लक्षणे-
हे सर्व ‘कळत नकळत’च घडत असल्याने ह्या रोगाची अशी विशिष्ट लक्षणे नाहीत. परंतु, सामान्यतः खालील गोष्टी ह्या रोगाच्या बळी पडलेल्या व्यक्तीला होतात.
  • विशिष्ट एका व्यक्तीच्या असण्याने/दिसण्याने/संपर्कात आल्याने अचानक प्रफुल्लीत होणे.
  • ती विशिष्ट व्यक्ती सोडून दुसरे कोणीच व्यक्ती आपलेसे न वाटणे.
  • सतत त्याच एका व्यक्तीबद्दल प्रेमभाव निर्माण होणे.
  • व्यक्ती समोर आल्यावर धडधड वाढणे, घाम फुटणे, जीव कावरा बावरा होणे.
  • त्या व्यक्तीसमोर काहीच बोलता न येणे.
  • परंतु त्याच व्यक्तीसमोर सतत जाण्याची अथवा व्यक्तीच्या संपर्कात राहण्याची इच्छा होणे.
  • सतत त्याच व्यक्तीचे विचार येत राहणे. त्यामुळे व्यवस्थित झोपही न येणे. अथवा झोपेत त्याच व्यक्तीबद्दल स्वप्न पडणे.
  • मित्र/मैत्रिणी सोबत असतांना देखील एकटेपणा वाटणे.
  • त्या व्यक्तीबद्दलच गप्पा माराव्या वाटणे.
  • सर्व ठिकाणी त्या विशिष्ट व्यक्तीचा आभास होणे.
ही सामान्य लक्षणे समजावीत. याहून कितीतरी अधिक लक्षणे व त्यांच्या माहितीसाठी ‘कळत नकळत’च्या मधुरा पाठक (देशमुखांच्या ‘ऋजुता’ला) भेटावे.
प्रेम रोगाचे (दुष्प)परिणाम-
जीवनावर याचे गंभीर परिणाम होतात. प्रेम रोग ग्रस्त व्यक्ती न व्यवस्थित राहते. न ज्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले प्रेम, त्या व्यक्तीला राहू देते. सतत रोग ग्रस्त व्यक्ती प्रेमभाव वाटणार्या व्यक्तीच्या अवतीभवती फिरते. झोप व्यवस्थित न झाल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे मनस्ताप व चिडचिड होण्याचा संभव. कदाचित जर ती विशिष्ट व्यक्ती चांगल्या प्रकारे वागणूक देत असेल तर, ह्याच्या उलटही घडू शकते. परंतु सामान्यतः लाखास एक असे प्रमाण असल्याने याचे सुपरिणाम पेक्षा संभाव्य धोक्याचीच चिंता केलेली योग्य.
प्रेम रोगावर उपाय-
ह्यावर अजून कोणताही इलाज शोधला न गेल्याने हा रोग ‘नाईलाज’ आहे. परंतु, रोगमुक्त झालेल्या व्यक्तींच्या अनुभवावरून काही उपाय
  • आत्महत्या- हा सर्वोत्तम उपाय आहे. सर्व नाईलाज रोगांचा उत्तम व सोपा उपाय.
  • त्या व्यक्तीसोबत ‘लग्न’ करावे. व्यक्तीचे खरे स्वरूप आपोआप कळून जाईल.
  • ते न शक्य झाल्यास दुसर्या कोणत्या तरी व्यक्तीच्या प्रेमात पडावे.
  • विवेकानंदांची अथवा साधू पुरुषांचे/अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करावे.
  • एक आकर्षण आहे, असा स्वतःचा समज करून घ्यावा. त्याकरिता जेम्स बॉन्डचे जुने चित्रपट पाहावेत. अथवा स्वतः जेम्स बॉन्ड आहोत असा समज करून घ्यावा.
  • हे सर्व शक्य न झाल्यास त्या व्यक्तीला मनातील सर्व सांगून टाकावे. कदाचित ती व्यक्ती चिडली तर रोग कमी होण्याची अधिक शक्यता.
  • वरील सर्व उपाय न जमल्यास दारू, सिगारेट अथवा अन्य एखादे व्यसन लावून घ्यावे.
  • तेही न शक्य झाल्यास ‘रडत’ बसावे.
  • हा सर्वात अवघड परंतु रोग निदान उपाय – त्या व्यक्तीला आपल्या प्रेमात पाडावे. यासाठी एखादा ‘प्रेमगुरु’ अथवा रेडीओ वरील कार्यक्रमांचा आधार घ्यावा. अथवा ज्यांनी हा उपाय शक्य करून दाखवला त्यांची मदत मागावी.
  • यातील कोणताच उपाय करू न शकल्यास स्वतःला बेकार समजून नुसते आकाशाकडे किंवा एकटक पाहत बसू नये. कारण ह्या गोष्टीमुळे कामाचा व्याप वाढला असेल. तो डोंगर कमी करावा. ‘गझनी’ मधील अमीर, ‘देवदास’ मधील शारुख अथवा ‘तेरे नाम’ मधील सलमान समजून वागू नये.
इतरांसाठी एक विशेष सूचना-
जर तुम्हाला या लक्षणाचा कोणी रोगी आढळल्याला त्यावर भूतदया दाखवावी. वेडा अथवा मूर्ख समजून त्याची हेटाळणी करू नये.. परंतु धोका नको म्हणून वेड्याचा इस्पितळाचा नंबर घेऊन ठेवावा.

का?

प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का?’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का?’ म्हणत ‘का?’ येतो. या विचाराने मन खजील होते.
कंपनीत जाण्यासाठी मोटारसायकल काढतो. खड्यांतून ‘मार्ग’ काढतांना ‘अस का?’ विचारात ‘का?’ सोबत असल्याची जाणीव करून देतो. चौकात उभा असलेला हवालदार दिसतो. त्याच्याच बाजूला उभी असलेली त्याची मोटारसायकल पाहून ‘यांना नियम लागू होत नाहीत का?’ असा विचार मनात घोळतो. आणि या विचारासोबत तो ‘का?’ येतो. कंपनीत कामाला सुरवात होते. काम वेळेत पूर्ण करण्याच्या ओघात दिवस कधी मावळतो ते कळतही नाही. घरी येतांना रेल्वे स्टेशन, आणि शहराच्या सुरवातीला नजर जाईल तिथपर्यंत पसरलेल्या झोपडपट्या पाहून देखील तो का? येतो. रात्री जेवतांना टीव्ही सुरु करतो. आणि ‘का?’ अगदी वेळेवर पोहोचतो. त्यानंतर तो ‘का?’ मुळीच पाठ सोडत नाही.
सोनीच्या ‘सीआयडी टीम’ला पाहून पुणे-मुंबई पासून दिल्लीला झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यांच्या गुन्हेगारांचा तपास त्यांच्याकडे का सोपवत नाही? असाही ‘दुधखुळ्या’ विचारात तो ‘का?’ असतोच. द्वी-सप्ताहातून हमखास येणारी भाववाढीची बातमी, आणि दोन महिन्यातून किमान एकदा येणारी राष्ट्रीय नेत्यांच्या परदेश दौरयाची बातमी पाहून. हे राहू, केतू आमच्याच नशिबी का? म्हणत का? उभा राहतो. हा ‘का?’ का सारखा येतो? मग मन त्रागा करू लागते. मनस्ताप वाढू लागतो. निवडणूक आल्यावर मी माझा राग माझ्या ‘मताद्वारे’ नोंदवतो. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पडलेला असतो. परंतु, सत्तेची माळ त्याच भ्रष्ट पक्षांकडे असते. मग मात्र, का? प्रश्नावली भंडावून सोडते. मन शांत करण्यासाठी मी त्याची करमणूक करतो.
चित्रपटांचा आणि संगीताचा आधार घेतो. चित्रपटात पाहतांना ‘का?’ सोबत ‘कशाला?’ सुद्धा येतो. चित्रपट पाहून आपली चित्रपटसृष्टी इतकी ‘फेकू’ आहे यावर विश्वासच बसेनासा होतो. मग तो चित्रपट ‘बनवणारा’ मुर्ख की ‘पाहणारा’ मुर्ख असा हास्यास्पद विचार मनात येतात. रात्री घरी येतांना ‘का?’ सारखा का येतो? असा प्रश्न निर्माण होतो. स्वतः तर काही दोष नाहीत ना असाही विचार मनाला चाटून जातो. रात्री उद्विग्नता वाढते. सकाळी डोळे उघडतो आणि.. परत ‘तो’ नव्याने येतो..

विश्वास आणि अपेक्षा

विश्वास ही अशी गोस्ट आहे की आपण दुसर्‍या व्यक्तीवर किंवा वस्तुवर काही चिंता किंवा विचार न करता त्याकडून आपल्याला हव तस काम होईल अशी केलेली अपेक्षा. खर तर माझा विश्वास सहजासहजी कोणावर बसत नाही. आणि मी अपेक्षा देखील करत नाही. अपेक्षा म्हणजे आपण दुसर्याकडून केलेली इच्छा. या दोनिहि गोस्टी पासून मी स्वतल दूरच ठेवण्याचा प्रयन्त करतो. कारण  रूपालीचा अनुभव घेतल्या नंतर कधी कोणावर विश्वास बसलाच नाही. मी अपेक्षा या करता करत नाही की आपली अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर मग वेदना देखील आपल्यालाच होतात. मग मन बेचैन होत. मनाला समजावं खूप अवघड असत.
याचा मला चांगलाच अनुभव आहे. मन लवकर एखधि गोस्टीला ताबडतॉप मानत नाही. आणि जर त्याने कधी कोणाला आपले मानले आणि त्याने जर आपली अपेक्षा भंग केला तर अजुनच अवघड होऊन  बसत. असा मला अनुभव येऊन सुध्धा मी पुन्हा एक गोड मुलीच्या प्रेमात पडलो. ती अगदीच छान. माझ्या सारख्या फालतू मुलासोबत ती अगदी प्रेमळ पणे वागायची. मला जशी हवी होती तशी. माझ म्हणन समजून घेणारी, मी जरी तिच्यावर चिडलो तरी ती शांत राहणारी  मला समजून घेणारी.
माझ्या लहान भावा- बहीनीचा अभ्यास घेणारी, त्यांची काळजी घेणारी, त्यांवर माझ्या इतकेच  प्रेम करणारी. ती खूपच सुंदर आहे. तरी देखील तिला गर्व नाही. अशी आज माझ्याशी  चक्क  खोट   बोलली. असो चुक तर माझी होती ना. विश्वास आणि अपेक्षा केल्या. आज बोलन झाल्यावर मन अगदी सुन्न झाल  होत. तिला मी कधीच माझ्या मनतल सांगू शकणार नाही. पण काय करू तिच्या सगळ्या गोस्टी आपल्या वाटतात . ती माझ्या साठीच आहे अस वाटत.

हृदय स्पर्शी प्रेम कथा

कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का,गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय, बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८०मिस-कॉल असतील.तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही. काय समजतोस तू कोण स्वताला?
अग हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमल फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता...
मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोट बोलतोस माझ्याशी बसला असशील मित्रांबरोबर टवाळक्या करत आता लग्न झालाय तुझ लहान
नाहीस अजून.
सोड न राग आता ये न मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीतआल्यावर पटकन पळून जातो.... ...
मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचय मिठीत... सचिन आणि सवी... एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला,प्रेम खूप होत दोघांचएकमेकांवर पण सतत अशीच भांडण चालू असायची, जास्त गंभीर नसायचीपण.
कॉलेजपासून सचिन सवी वर खूप प्रेम करत होता, तिचाही त्याच्यावर खूप प्रेम होत, शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वताच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणीघातली. तिने त्याला होकार दिला आणि त्याचं लग्न झाल.
"अग मला वाटल आपल्या सकाळच्या भांडणा नंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात,म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटल अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चोक्लेट्स आणलीततुझ्यासाठी."
"मला नकोयत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते कारे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का? मलावाटल मी सकाळी जरा जास्तीच नाटक केली, तू रागावला असशील माझ्यावरम्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटल विचारव तुला, कि तू कधी येतोयस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असत."
"आता हे मला माहित होत का, तूच एक एसमेस करून सांगायचास ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आतातरी ये ना मिठीत.
नाही म्हणजे नाही.... मी नाय येणार जा." "त्यासाठी तर मी आलोय ना इथे..." "काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी संग तू कुठे होतास इतका वेळ ते, अन तेही खर खर संग.....
"बर मग आईक. मी ऑफिस मधून थोडा अर्धा-पावून तास उशीरच निघालो, निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटल तू आता रागावशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भाद्क्शील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला
फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चोक्लेट्स घेवून. पण काय करू नेमका पावूस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला कि मला पुढच नीट दिसतही नव्हत, आणि तेवड्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार
त्या ट्रक वर जावून जोरात आदळली.
माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामीझाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय
झाले मला काहीच कळले नाही...
कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती वरती खूप वरती घेवून गेला." सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होत. सवी खरोखरच झोपताना सचिनशी भांडून झोपली होती आणि तिला अशीचसवय
होती जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण
वाढवण्याची.
तिने सचिनला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी आईकून. तो हि घाबरला होता आणि तिला विचारात होता...
"अग सवी काय झालाय, तुला बर नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडल का?
अग शोना बोलना....काय झाल? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी." "हे घे पाणी, पी. आता संग काय झाल?" मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशीवाद घालू, आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वरअजिबात नाही बोलायचं, खरतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. सामोरा समोर बसून आपण भांडण मिटवू....
" i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलत तिने पूर्ण स्वप्न
सांगितले सचिनला...
"i love u tooo .......मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय...ब ावळट कुठली." ♥

लेखक:अनामिक

Wednesday 25 April 2012

काही ब्रेकिंग न्युज

मी काल रात्री बघितलेल्या
काही ब्रेकिंग न्युज.....
१. मुली आणी सर्व महिला आता
पार्लर ला कधीच जाणार नाहीत...
२. बायका खरेदी वर बहिष्कार
... टाकणार...
३. सास बहुच्या सिरिअल्स बंद
होणार...
४. कलमाडी स्वतः परदेशातील
काळा पैसा परत यावा म्हणून
... उपोषण करणार..
५. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंड
ला मिसकाल न करता कॉल करणार...
अर्थात सांगायची गरज
नाही कि मी झोपेत
होतो...
तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युज
ची स्वप्न पडतात का...?
नाही ना? मग झोपा आता
म्हणजे पडेल... स्वप्न हो..

एक परप्रांतीय महाराष्ट्रात येणार

एक परप्रांतीय महाराष्ट्रात येणार
रस्त्यावर केळीची गाडी थाटणार
कमावलेला पैसा घेऊन मग
अख्या गावभर जाऊन वाटणार
आणि मराठी माणूस........फक्त बघतच राहणार
...
दुसरा परप्रांतीय महाराष्ट्रात येणार
उपाशी पोटी काहीही चरणार
इथेच राहून आपल्याबरोबर
कित्ती सहज दादागिरी करणार
... आणि मराठी माणूस........फक्त बघतच राहणार

तिसरा परप्रांतीय महाराष्ट्रात येणार
आपल्याच लोकांत सुखात नांदणार
राहत्या जागेतच एका वर्षात
दहा घर घुपचूप बांधणार
आणि मराठी माणूस........फक्त बघतच राहणार

चौथा परप्रांतीय महाराष्ट्रात येणार
वेस्टर्न रेल्वे जाम करणार
भाजी, मच्छी, भेळपुरी, पान
जे भेटेल ते काम करणार
आणि मराठी माणूस........फक्त बघतच राहणार

आपसातले हेवेदावे विसरून आपण
मतभेदाची भिंत कधी पडणार
एके दिवशी हेच परप्रांतीय
आपला अक्खा महाराष्ट्र विकाय काढणार...

आपण फक्त एकच म्हणायचं...
काय सारख + सारख मराठी, मराठी करायचं....

पण, जेव्हा एके दिवशी हेच परप्रांतीय आपला अक्खा महाराष्ट्र विकाय काढणार...
तेव्हा आपल्या लक्षात येणार, मराठीला जन्म राजांनी दिला असल, पण आपण जागवायला तरी पाहिजे होत.....

मराठयांनो व्हा पुन्हा एकत्र, विसरा सारे राजकीय पक्ष
आपलं ध्येय आपला अखंड महाराष्ट्र... सर्वत्र फडकवा शिवरायांचे भगवे...

मराठी असल्याच असेल गर्व, तर सर्वांनी आपल्या स्टेट्स वर तरी नक्कीच ठेवा....मराठी एकता शक्तीसाठी..

जय महाराष्ट्र..

मित्र कुठेतरी वाचलेली हि गोष्ट..

एक मुलगी होती साधी सरळ थोडीसी खट्याळ ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....
आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला....
अशीच दोघांची एकदा ओळख झाली
.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....
ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....
जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा.
तिला विचारायचा
"का काल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची".
ती त्याला त्याला म्हणायची कि,
"नाही sorry काल नाही जमल फोन करायला".
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा... त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...
रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...
तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे..ती त्याला sms करायची......
त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...
किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती
त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत
बसायची.
"पाहिले मी तुला, तू मला पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले"
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला
त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अग तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची"मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू शकत"..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्य ाशिवाय तिच्या मनात कोणी नसे..
...तिला त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत.... तो कसा आहे ? त्याचा स्वभाव कसा आहे ?
त्याच दिनक्रमच तिला माहित झाल होत..तो कधी जेवतो.... घरी किती वेळ
असतो... मित्रान बरोबर किती वेळ असतो...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटत
होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण तस काही नव्हते.
असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच् या पण गप्पा छान रंगल्या होत्या
..आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....पण काही केल्या तिला ते
जमत नव्हते...मग त्यानेच तिला विचारले"तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली..."छे ! एवढ्यात लवकर नाही अजून वेळ आहे बघू"....मग
तीने त्याला विचारलं"तू कधी करतोस लग्न"..तो तीला म्हणाला"मी लग्न
करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूप दुखी होते... काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण स्वतःला सावरून ... ती परत त्याला
विचारते..."तू असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो"होय , आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे खूप सुखी आहे".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल आहे असे तिला वाटू
लागल..मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ... आणि ती
त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...
"सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"
तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून जातो.
"तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच होईल..."
पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील"
करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती ........आता तिला तीच प्रेम व्यक्त करण जमत नव्हते...
अजून हि ते दोघे तसेच रोज बोलत आहे....रोज फोन आणि sms चालू आहे....
त्याला कळत नव्हते ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत आहे एका निष्पाप मनाने
तिला अशा आहे कि आज उद्या त्याला तीच प्रेम कळेल..आणि ती त्याला सगळ सांगेल.....
पण अजून हि तो मुलगा तिला काही बोलला नाही.... ती वाट पाहत आहे त्याची.....
आणि स्वतःला प्रश्न करत बसली आहे ...
"प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा
लपसी कोठे गोपाळा, गोविंदा...
तिला मिळेल का त्याच प्रेम.......... ........?
आपल्या भावना ती व्यक्त करू शकेल का त्याला....?
का अशीच वाट पाहत बसेल त्याची ....?
............... ....