Wednesday 23 May 2012

हिंदु …

भगवा रंग… झाकोळला गेलाय.
संत तुकाराम, रामदास स्वामींनी खांद्यावर दिलेली भगव्या रंगाची पताका घेउन जेंव्हा  शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर उभे राहिले असतील, आणि आपला हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचा निर्णय सांगितला असेल तेंव्हा जिजाऊंच्या डॊळ्यात पाणी नक्कीच तराळले असेल नाही का?? मग त्या पाणी भरलेल्या डोळ्य़ांनी जेंव्हा आपल्या १६- १७ वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर त्या माऊलीने आपला हात ठेऊन आशीर्वाद दिला असेल तेंव्हा शिवरायांच्या मनातल्या त्या हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचे स्वप्न कधी ना कधी तरी पुर्ण होईलच अशी खात्री असेलच, म्हणूनच त्या माऊलीने आपल्या काळजाच्या तुकड्याला हातामधे तलवार घेऊन बाहेर जाऊ दिले असेल .
दुर्दैवाने आज पर्यंत  ते स्वप्न   पुर्ण झाले नाही- आणि कधी होण्याची अपेक्षाही नाही. ’स्वराज्य’ तर मिळाले, पण ’सुराज्य’ मिळायची आम्ही अजूनही वाट पहातोय.   हिंदूपदपातशाही स्थापनेच्या स्वप्नाला तर नेत्यांनी सरळ………असो लिहित नाही जास्त, कारण विनाकारण विषयांतर होईल.
स्वतःला हिंदू  म्हणवून घेण्या पेक्षा निधर्मी म्हणवून घेण्याकडे आपल्या नेत्यांचा  कल वाढतोय. लोकांना अभिमान वाटतोय  हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा निधर्मी   म्हणवून घेण्याचा.  हिंदुस्थानचा भारत कधी झाला ते समजलेच नाही.
शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या खांद्यावर दिलेल्या त्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे आज काय झाले आहे? प्रत्येक पक्षाने त्यामधे आपले वेगवेगळे स्वार्थाने लडबडलेले  ’बेगडी’ रंग मिसळून भगव्याची  पार  वाताहात करून टाकली आहे.  कोणी त्यामधे हिरवा,  कोणी हिरवा +निळा ,  मिसळतो , तर कुठला तरी एखादा पक्ष आपला निधर्मी स्वरूप एंडॉर्स करायला पांढरा रंग पण  वापरतो.
दुर्दैवाने आज  प्रत्येकच पक्षाला शिवाजी महाराजांची आठवण येते ती फक्त राजकारणासाठी! त्यांचं स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य  स्थापन करणे.  ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने धुरा दिली होती , त्यांनी आपली जबाबदारी हे आपल्या  खांद्यावरचं हे भगव्या रंगाचं “ओझं” आहे असे समजून काढून फेकण्यात, आणि निधर्मी रंगीबेरंगी झेंडे घेऊन नाचण्यात  मोठेपण मानतात.
अरे कशासाठी त्या माऊलीने आपल्या लेकराला घोड्यावर बसवून उन्हातान्हात  लढायला पाठवले होते?? कशासाठी शेकडॊ मावळ्यांनी   आपला जीव दिला ??  श्री  शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी हिंदूपदपातशाही होती ती हीच का?? हा प्रश्न मला कालपासून छळतोय.
कालच एक बातमी वाचली.  फ्रान्स सरकारने बुरखा घालण्याकरता कायद्याने बंदी घातली आहेच. आता अशी बातमी आहे की आता फ्रान्स चे  सरकार बहुपत्नित्वाचा कायदा रद्द करणार आहे. कुठल्याही धर्माच्या लोकांना एका पेक्षा जास्त लग्नं करण्यात येणार नाहीत. बऱ्याच लोकांचे नागरीकत्व रद्द होण्याचे चान्सेस पण आहेत. त्या पार्श्वभूमीवर    आपल्या सरकारचे बोटचेपे धोरण मात्र बरेचदा मनःस्ताप देऊन जाते.
सरकारने तर हिंदू असल्याबद्दल जिझिया कर तर लावलेला नाही, पण  हिंदू असल्याबद्दल तुम्हाला लाज वाटावी असे वागणे  निश्चितच सुरु केले आहे.  कदाचित त्या दिशेने वाटचालही सुरु आहे.
तूम्ही हिंदू आहात?? तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कशाला हवा?? बुट पॉलीश करा, रामागडी म्हणून कामं करा, गेला बाजार, भाजी विका, मासे विका, .. शिक्षण ?? छे …  ते   तुमच्या साठी   नाही- आणि जर तरीही शिकायची इच्छा असेलच, तर पदरचे पैसे खर्च करून शिका!.
सरकारने इतर सगळ्या धर्मियांना  जास्तीत जास्त फॅसिलिटीज द्यायच्या आणि हिंदूंना मात्र शक्य तितके ताणायचे असे धोरण अवलंबिले आहे. लांगूलचालनाची परंपरा मात्र काही राजकीय पक्ष अगदी इमाने इतबारे  आणि काटॆकोर पणे जोपासताहेत. . असो!!
यावर एक छान लेख वाचला होता आणि त्यावर लिहिण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते पण नंतर राहून गेले .   त्या लेखा मधे एक पत्र लावलेले दिसले, ते इथे पेस्ट करतोय. त्याबद्दल  जास्त काही लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्र वाचले की सगळे समजेल.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं..महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही चुकलो.. आपल्याला अभिप्रेत असलेला हिंदुस्थान आणि हिंदुपदपातशाही   आम्हाला समजलीच नाही.

No comments:

Post a Comment